अथणी : विजयपूर पोलीस ठाण्यातील पीएसआयविरोधातील तक्रारीबाबत करण्यात आलेल्या पत्रप्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे आश्वासन उत्तर विभागाचे आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी दिले आहे.

आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी अथणी पोलीस ठाण्याला भेट देऊन सीईआयआर पोर्टलवर दाखल तक्रारींच्या आधारे राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेचा आढावा घेतला. या मोहिमेत पोलिसांनी हरवलेले मोबाईल फोन शोधून ते त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले.

या भेटीदरम्यान जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन वारसांच्या ताब्यात देण्यात आले. तक्रार नोंदवलेल्या नागरिकांना मोबाईल मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

दरम्यान, विजयपूर येथील पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी पीएसआयविरोधात पत्रव्यवहार केल्याच्या मुद्द्यावर पत्रकारांनी विचारले असता, या प्रकरणाची योग्य चौकशी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी दिले.