बेळगाव : येथील शांती नगर टिळकवाडी येथे वीर सावरकर उद्यान मध्ये रहिवासी संघटनेतर्फे भारतीय ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. माजी उपमहापौर आनंद चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वाय. पी. नाईक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी नारायण आपटेकर, विलास काळे,बापू पट्टणशेटी, विलास बसरीमरद प्रतिभा हावळ, श्वेता खांडेकर, विद्या पाटील, लक्ष्मण वालीकर, डॉ. गिरीधर पाटील, डॉ. मरली, बलवंत राजाई, मंदार उचगावकर, गणपती कब्बूर, प्राथमिक शाळेतील शिक्षक आत्तार, विद्यार्थी आदी मान्यवर रहिवासी उपस्थित होते. पी. एन. बेळीकेट्टी यांनी आभार मानले.