बेळगाव : दीर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा (क्रमांक ४/२००४) दि. २९ मार्च २००४ रोजी राज्यघटनेच्या अनुच्छेद १३१ (ब) अन्वये सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. पण २२ वर्षे झाली तरी त्याची सुनावणी सलग होऊ शकली नाही. सदर सुनावणी लवकरात लवकर जलद गतीने करावी, अशी विनंती बेळगांव जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने सरन्यायाधीशांना करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना सीमा भागातील मराठी भाषिकांचे एक लाख सह्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ करण्यासाठी रविवार दि. २९ मार्च रोजी सायंकाळी चार वाजता मराठा मंदिर (रेल्वे ओव्हर ब्रीजजवळ) खानापूर रोड येथे मराठी भाषिकांची बैठक बोलाविण्यात आली आहे. सर्वांनी उपस्थित राहून ही मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर व कार्यकारिणीने केले आहे.
March 26, 2026
बेळगाव / प्रतिनिधी कुद्रेमानी गावात रामनवमीच्या मुहुर्तावर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण आणि अखंड हनुमान जन्मोत्सव सोहळ्याचे मुहूर्तमेढ मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या […]








