<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>farmer Archives | News 24 Tass Marathi</title>
	<atom:link href="https://news24tassmarathi.in/category/farmer/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://news24tassmarathi.in/category/farmer/</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Wed, 12 Aug 2026 13:01:45 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0.4</generator>

<image>
	<url>https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/07/android-chrome-192x192-nobg-75x75.png</url>
	<title>farmer Archives | News 24 Tass Marathi</title>
	<link>https://news24tassmarathi.in/category/farmer/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>कल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनीसाठी लढा</title>
		<link>https://news24tassmarathi.in/kalleholchya-shetkaryancha-hakkachya-jaminisathi-ladha/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/kalleholchya-shetkaryancha-hakkachya-jaminisathi-ladha/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 12 Aug 2026 13:01:44 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[dc office]]></category>
		<category><![CDATA[deputy commissioner]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[memorandum]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18939</guid>

					<description><![CDATA[<p>जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावातील शेतकऱ्यांनी आपल्या पूर्वजांपासून कसत असलेल्या जमिनी वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. भूमाफिया आणि काही अधिकाऱ्यांकडून<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/kalleholchya-shetkaryancha-hakkachya-jaminisathi-ladha/">कल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनीसाठी लढा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> बेळगाव तालुक्यातील कल्लेहोळ गावातील शेतकऱ्यांनी आपल्या पूर्वजांपासून कसत असलेल्या जमिनी वाचवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन केले. भूमाफिया आणि काही अधिकाऱ्यांकडून जमीन बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली.</p>
<p style="text-align: justify;">कल्लेहोळ येथील सुमारे १०० ते १२५ शेतकरी कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. १९७२ च्या न्यायाधिकरण कायद्यानुसार कसणाऱ्याच्या हक्काची जमीन असल्याचा दावा करत, शेतकऱ्यांकडे फॉर्म क्रमांक ७, फॉर्म क्रमांक १० यासह आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. असे असतानाही काही भूमाफिया आणि अधिकारी संगनमताने जमिनीवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.</p>


<p class="wp-block-paragraph"></p>


<div class="wp-block-image">
<figure class="aligncenter size-full"><img fetchpriority="high" decoding="async" width="1200" height="675" src="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/08/3-1-1.webp" alt="" class="wp-image-18941" srcset="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/08/3-1-1.webp 1200w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/08/3-1-1-500x281.webp 500w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/08/3-1-1-300x169.webp 300w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/08/3-1-1-768x432.webp 768w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/08/3-1-1-133x75.webp 133w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/08/3-1-1-480x270.webp 480w" sizes="(max-width:767px) 480px, (max-width:1200px) 100vw, 1200px" /></figure>
</div>


<p class="wp-block-paragraph"></p>


<p style="text-align: justify;">उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिलेला आदेश रद्द करून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्क मिळवून द्यावा, अशी मागणी राष्ट्रीय रयत संघाच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन करण्यात आली. न्याय न मिळाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आर. एम. चौगुले यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांवर अन्याय सुरू राहिल्यास त्यांच्या हक्कासाठी संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.</p><p>The post <a href="https://news24tassmarathi.in/kalleholchya-shetkaryancha-hakkachya-jaminisathi-ladha/">कल्लेहोळच्या शेतकऱ्यांचा हक्काच्या जमिनीसाठी लढा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/kalleholchya-shetkaryancha-hakkachya-jaminisathi-ladha/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>उगार साखर कारखान्याच्या समर्थनार्थ बेळगावात शेतकरी- कामगारांचा मोर्चा</title>
		<link>https://news24tassmarathi.in/ugar-sakhar-karkhanyachya-samarthanarth-belgaavat-shetkari-kamgarancha-morcha/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/ugar-sakhar-karkhanyachya-samarthanarth-belgaavat-shetkari-kamgarancha-morcha/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 30 Jul 2026 13:03:22 +0000</pubDate>
				<category><![CDATA[dc office]]></category>
		<category><![CDATA[deputy commissioner]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[kagwad]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[memorandum]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18607</guid>

					<description><![CDATA[<p>पर्यावरणीय आरोपांवर आक्षेप कारखान्याचे कामकाज अबाधित ठेवण्याची प्रशासनाकडे मागणी बेळगाव : कागवाड तालुक्यातील उगार साखर कारखान्याविरोधात करण्यात येत असलेल्या कथित पर्यावरणीय आरोपांच्या निषेधार्थ शेतकरी, कामगार आणि<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ugar-sakhar-karkhanyachya-samarthanarth-belgaavat-shetkari-kamgarancha-morcha/">उगार साखर कारखान्याच्या समर्थनार्थ बेळगावात शेतकरी- कामगारांचा मोर्चा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>पर्यावरणीय आरोपांवर आक्षेप</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>कारखान्याचे कामकाज अबाधित ठेवण्याची प्रशासनाकडे मागणी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> कागवाड तालुक्यातील उगार साखर कारखान्याविरोधात करण्यात येत असलेल्या कथित पर्यावरणीय आरोपांच्या निषेधार्थ शेतकरी, कामगार आणि स्थानिक नागरिकांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार आंदोलन केले. कारखान्याच्या कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशी मागणी आंदोलकांनी निवेदनाद्वारे केली.</p>
<p style="text-align: justify;">उगार साखर कारखान्यावर अवलंबून असलेल्या हजारो शेतकरी, कामगार आणि परिसरातील नागरिकांच्या उपजीविकेचा विचार करून प्रशासनाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. कारखान्यात काही त्रुटी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांनी त्या दूर करण्यासाठी आवश्यक सूचना द्याव्यात; मात्र कोणत्याही कारणामुळे कारखान्याचे कामकाज ठप्प होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p style="text-align: justify;">कारखान्याला अडचणी निर्माण झाल्यास त्याचा थेट फटका शेतकरी, कामगार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला बसेल, असे सांगत प्रफुल्ल थोरुशे यांनी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.</p>
<p style="text-align: justify;">या आंदोलनात उगार साखर कारखान्याचे मोठ्या संख्येने कामगार, शेतकरी आणि स्थानिक नागरिक सहभागी झाले.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ugar-sakhar-karkhanyachya-samarthanarth-belgaavat-shetkari-kamgarancha-morcha/">उगार साखर कारखान्याच्या समर्थनार्थ बेळगावात शेतकरी- कामगारांचा मोर्चा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/ugar-sakhar-karkhanyachya-samarthanarth-belgaavat-shetkari-kamgarancha-morcha/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>चिक्कोडीत शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन</title>
		<link>https://news24tassmarathi.in/chikkodit-shetkaryanche-bhavya-andolan/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/chikkodit-shetkaryanche-bhavya-andolan/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 30 Jul 2026 08:01:33 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Chikkodi]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18591</guid>

					<description><![CDATA[<p>भूसंपादनाला योग्य मोबदला ; सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची मागणी चिक्कोडी : राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांची तातडीने<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/chikkodit-shetkaryanche-bhavya-andolan/">चिक्कोडीत शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>भूसंपादनाला योग्य मोबदला ; सिंचन प्रकल्पांची अंमलबजावणी करण्याची मागणी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>चिक्कोडी :</strong> राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित करण्यात आलेल्या जमिनीला योग्य नुकसानभरपाई मिळावी आणि तालुक्यातील प्रलंबित सिंचन प्रकल्पांची तातडीने अंमलबजावणी करावी, या प्रमुख मागण्यांसाठी चिक्कोडीत हजारो शेतकरी रस्त्यावर उतरले. विविध शेतकरी संघटनांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.</p>
<p style="text-align: justify;">शहरातील बसवेश्वर सर्कल येथे मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र जमले आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलन अधिक प्रभावी करण्यासाठी शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर बैलगाड्यांची रांग लावत वाहतूक रोखली. या अनोख्या आंदोलनामुळे परिसरात काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.</p>
<p style="text-align: justify;">कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि स्थानिक शेतकरी नेत्यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. संघटनेचे मानद अध्यक्ष शशिकांत गुरुजी, अध्यक्ष चन्नप्पा पुजेरी, उपाध्यक्ष सत्यप्पा मल्लापुरे, चिक्कोडी संपदन स्वामीजी तसेच चिंचणीचे शिवप्रसाद देवा यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांनी सरकारने शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.</p>
<p style="text-align: justify;">राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित जमिनीचा योग्य मोबदला आणि सिंचन सुविधांचा विस्तार झाल्यासच शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असा ठाम सूर आंदोलनादरम्यान उमटला. सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही शेतकरी नेत्यांनी दिला.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/chikkodit-shetkaryanche-bhavya-andolan/">चिक्कोडीत शेतकऱ्यांचे भव्य आंदोलन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/chikkodit-shetkaryanche-bhavya-andolan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>कृषी तलावात बुडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू</title>
		<link>https://news24tassmarathi.in/krushi-talavat-budun-pragatshil-shetkaryacha-durdaiwi-mrutyu/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/krushi-talavat-budun-pragatshil-shetkaryacha-durdaiwi-mrutyu/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 22 Jul 2026 17:03:16 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Accident]]></category>
		<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[drown]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18392</guid>

					<description><![CDATA[<p>कक्केरी परिसरात हळहळ ; शेतातील काम करताना पाय घसरला कुटुंबावर आर्थिक संकट कक्केरी :  येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा स्वतःच्या शेतातील कृषी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/krushi-talavat-budun-pragatshil-shetkaryacha-durdaiwi-mrutyu/">कृषी तलावात बुडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>कक्केरी परिसरात हळहळ ; </strong></span><span style="color: #ff0000;"><strong>शेतातील काम करताना पाय घसरला</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>कुटुंबावर आर्थिक संकट</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>कक्केरी : </strong> येथील प्रगतशील शेतकरी मल्लय्या दुंडय्या हिरेमठ (वय ५२) यांचा स्वतःच्या शेतातील कृषी तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. शेतातील काम सुरू असताना पाय घसरून ते पाण्यात पडल्याने हा अपघात झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हिरेमठ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.</p>
<p style="text-align: justify;">मिळालेल्या माहितीनुसार, मल्लय्या हिरेमठ हे नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेले होते. कृषी तलावाच्या परिसरात वाढलेले गवत आणि कचरा साफ करत असताना त्यांचा अचानक तोल गेला आणि ते तलावात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.</p>
<p style="text-align: justify;">मल्लय्या हिरेमठ यांच्या पश्चात पत्नी भारती (वय ४५), बी.एस्सी. नर्सिंगच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेणारी मुलगी ऐश्वर्या (वय २०) आणि डिप्लोमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारा मुलगा अक्षय (वय १७) असा परिवार आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्णपणे शेतीवर अवलंबून होता. त्यांच्या नावावर सरकारी बँक तसेच कृषी पतसंस्थेचे लाखो रुपयांचे पीककर्ज असल्याने कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे.</p>
<p style="text-align: justify;">योगायोगाने ही घटना ‘शेतकरी हुतात्मा दिना’च्या दिवशीच घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.</p>
<p style="text-align: justify;">घटनेची माहिती मिळताच शेतकरी नेते यल्लप्पा गुपीत, रमेश वीरापूर, अश्पाक अहमद पटेल, महांतय्या हिरेमठ, चेन्नवीरय्या हिरेमठ, अलेक्झांडर डिसोजा, मारुती पाटील, यल्लेशी कुंभारकोप, शिवाजी अंबडगट्टी आणि यल्लप्पा चन्नापूर यांनी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच शासनाकडे पाठपुरावा करून कुटुंबाला आर्थिक मदत आणि योग्य भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, या घटनेची नोंद नंदगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक रविकुमार धर्मट्टी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/krushi-talavat-budun-pragatshil-shetkaryacha-durdaiwi-mrutyu/">कृषी तलावात बुडून प्रगतशील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/krushi-talavat-budun-pragatshil-shetkaryacha-durdaiwi-mrutyu/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>हिडकल जलाशयग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा</title>
		<link>https://news24tassmarathi.in/hidkal-jalashaygrastancha-jilhadhikari-karyalayavar-janavaransah-morcha/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/hidkal-jalashaygrastancha-jilhadhikari-karyalayavar-janavaransah-morcha/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Jul 2026 09:21:56 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[dc office]]></category>
		<category><![CDATA[deputy commissioner]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[Hukkeri]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[memorandum]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18221</guid>

					<description><![CDATA[<p>प्रलंबित नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सिंचन महामंडळावर दिरंगाई आणि लाचेच्या मागणीचे गंभीर आरोप विशेष बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन बेळगाव : हिडकल जलाशयासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित नुकसानभरपाईच्या<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/hidkal-jalashaygrastancha-jilhadhikari-karyalayavar-janavaransah-morcha/">हिडकल जलाशयग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>प्रलंबित नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>सिंचन महामंडळावर दिरंगाई आणि लाचेच्या मागणीचे गंभीर आरोप</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>विशेष बैठकीचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> हिडकल जलाशयासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांच्या प्रलंबित नुकसानभरपाईच्या प्रश्नावरून आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. शेकडो जलाशयग्रस्त शेतकरी आपल्या जनावरांसह राणी चन्नम्मा सर्कल येथे रस्त्यावर उतरले. सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी काही काळ रस्ता रोको केला आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.</p>
<p style="text-align: justify;">हुक्केरी तालुक्यातील हिडकल जलाशयग्रस्तांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. नुकसानभरपाईची प्रक्रिया जाणीवपूर्वक रखडवली जात असून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी सिंचन महामंडळाच्या अधिकाऱ्यांवर केला.</p>
<p style="text-align: justify;">आंदोलनाचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ शेतकरी नेते बालेश मावनूर यांनी सांगितले की, जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या प्रकरणी अनेक बैठका घेऊन अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मात्र, काही अधिकारी मंत्र्यांनाही चुकीची माहिती देत असल्याने शेकडो एकर जमिनीची नुकसानभरपाई अद्याप रखडली आहे.</p>
<p style="text-align: justify;">सरकार किंवा महसूल विभागाविरोधात आमचा संघर्ष नसून सिंचन महामंडळातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या कारभाराविरोधात लढा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. एसएलओ कार्यालयात आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असतानाही चुकीचे अहवाल तयार करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील आणि गरज पडल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, आंदोलकांचे निवेदन स्वीकारल्यानंतर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सिंचन महामंडळाच्या उत्तर विभागाच्या मुख्य अभियंत्यांसोबत विशेष बैठक घेण्याची घोषणा केली. या बैठकीसाठी आंदोलनकर्त्यांच्या चार ते पाच प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.</p>
<p style="text-align: justify;">बैठकीत अधिकाऱ्यांनी सादर केलेली कागदपत्रे आणि शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांची प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येईल. आवश्यक वाटल्यास राज्य सरकारकडे स्वतंत्र अहवालही पाठविला जाईल. वस्तुस्थितीची सखोल छाननी करून योग्य निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी आंदोलकांना दिले.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/hidkal-jalashaygrastancha-jilhadhikari-karyalayavar-janavaransah-morcha/">हिडकल जलाशयग्रस्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरांसह मोर्चा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/hidkal-jalashaygrastancha-jilhadhikari-karyalayavar-janavaransah-morcha/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मार्कंडेय नदीला पूर ; कडोलीसह परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली</title>
		<link>https://news24tassmarathi.in/markandeya-nadila-pur-kadolisah-parisaratil-shetjamini-panyakhali/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/markandeya-nadila-pur-kadolisah-parisaratil-shetjamini-panyakhali/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 08 Jul 2026 17:51:12 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[flood]]></category>
		<category><![CDATA[rain]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18052</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, कडोलीसह नदीकाठच्या गावांतील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात, ऊस, सोयाबीन<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/markandeya-nadila-pur-kadolisah-parisaratil-shetjamini-panyakhali/">मार्कंडेय नदीला पूर ; कडोलीसह परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मार्कंडेय नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असून, कडोलीसह नदीकाठच्या गावांतील शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे भात, ऊस, सोयाबीन आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.</p>
<p style="text-align: justify;">महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीतील पाण्याची आवक वाढली आहे. मार्कंडेय नदीला आलेल्या पुराचा फटका कडोली, कंग्राळी खुर्द, आंबेवाडी, अलतगा, बेळगुंदी आणि हिंदलगा परिसराला बसला आहे. अनेक शेतांमध्ये पाणी शिरल्याने उभी पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी चिंतेत आहेत.</p>
<p style="text-align: justify;">परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याची तयारी करण्यात आली असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी एसडीआरएफची पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.</p>
<p style="text-align: justify;">नागरिकांनी नदीकाठावर जाणे, पुराच्या पाण्यात उतरणे किंवा सेल्फी काढण्यासाठी धोकादायक ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/markandeya-nadila-pur-kadolisah-parisaratil-shetjamini-panyakhali/">मार्कंडेय नदीला पूर ; कडोलीसह परिसरातील शेतजमिनी पाण्याखाली</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/markandeya-nadila-pur-kadolisah-parisaratil-shetjamini-panyakhali/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>वीज खाजगीकरणाविरोधात बेळगावात शेतकऱ्यांचे आंदोलन</title>
		<link>https://news24tassmarathi.in/veej-khajgikaranavirodhat-belgaavat-shetkaryanche-andolan/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/veej-khajgikaranavirodhat-belgaavat-shetkaryanche-andolan/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 19 Jun 2026 11:21:29 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[dc office]]></category>
		<category><![CDATA[deputy commissioner]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[memorandum]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17434</guid>

					<description><![CDATA[<p>टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी बेळगाव : केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज क्षेत्रातील खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/veej-khajgikaranavirodhat-belgaavat-shetkaryanche-andolan/">वीज खाजगीकरणाविरोधात बेळगावात शेतकऱ्यांचे आंदोलन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li><span style="color: #ff0000;"><strong>टेंडर प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> केंद्र आणि राज्य सरकारच्या वीज क्षेत्रातील खाजगीकरणाच्या धोरणाविरोधात कर्नाटक राज्य शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे आंदोलन करण्यात आले. या वेळी शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सरकारच्या धोरणांचा निषेध व्यक्त केला आणि आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले.</p>
<p style="text-align: justify;">आंदोलनादरम्यान शेतकरी नेते चुनप्पा पुजारी यांनी सरकारच्या धोरणांवर टीका करत वीज क्षेत्रात खाजगीकरणाच्या माध्यमातून सर्वसामान्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकला जाण्याची शक्यता व्यक्त केली. सुरुवातीला कमी दर किंवा सवलतीच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करून नंतर दरवाढ करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">तसेच वीज वापरासाठी स्मार्ट कार्ड आणि जीपीएस आधारित यंत्रणा लागू केल्यास ग्राहकांच्या खात्यातील रक्कम संपल्यानंतर वीजपुरवठा तात्काळ खंडित होऊ शकतो. याचा सर्वाधिक फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसण्याची भीती त्यांनी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">सरकारने वीज खाजगीकरणासंदर्भातील निविदा प्रक्रिया तातडीने रद्द करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसे न झाल्यास राज्यभरातील शेतकरी एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्ग रोखण्यासह तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला.</p>
<p style="text-align: justify;">या आंदोलनात शेतकरी नेते प्रकाश नाईक यांच्यासह विविध भागांतील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/veej-khajgikaranavirodhat-belgaavat-shetkaryanche-andolan/">वीज खाजगीकरणाविरोधात बेळगावात शेतकऱ्यांचे आंदोलन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/veej-khajgikaranavirodhat-belgaavat-shetkaryanche-andolan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>उतारा समस्येवरून शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन</title>
		<link>https://news24tassmarathi.in/utara-samasyavarun-shetkaryanche-jilhadhikari-karyalayasamor-andolan/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/utara-samasyavarun-shetkaryanche-jilhadhikari-karyalayasamor-andolan/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 15 Jun 2026 18:14:13 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[dc office]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17311</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव : जमिनीच्या उताऱ्यासंदर्भातील अडचणी, वाढते शुल्क आणि कथित अनियमिततेच्या विरोधात राज्य किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. उतारा मिळविताना शेतकऱ्यांना आर्थिक आणि प्रशासकीय<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/utara-samasyavarun-shetkaryanche-jilhadhikari-karyalayasamor-andolan/">उतारा समस्येवरून शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> जमिनीच्या उताऱ्यासंदर्भातील अडचणी, वाढते शुल्क आणि कथित अनियमिततेच्या विरोधात राज्य किसान संघाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. उतारा मिळविताना शेतकऱ्यांना आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागत असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला.</p>
<p style="text-align: justify;">शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, अनेक ठिकाणी जमिनी एकत्र नोंद झाल्यामुळे उतारा स्वतंत्र मिळविण्यासाठी ३० ते ४० कागदपत्रे तयार करावी लागत असून त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. यामुळे सामान्य शेतकऱ्यांवर आर्थिक भार वाढत असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी उतारे स्वतंत्र करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली होती. मात्र, प्रत्यक्षात महसूल विभागाकडून प्रति एकर ठराविक रक्कम आकारली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. प्रशासकीय पातळीवरील त्रुटींचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">ग्रामीण भागातील अनेक कुटुंबे गेल्या अनेक दशकांपासून आपल्या जागेत वास्तव्यास आहेत. मात्र, आता मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी खरेदीपत्राची अट घातली जात असल्याने त्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मूळ जमीनमालकांचे निधन झाल्यानंतर वारसदारांकडून विविध मागण्या केल्या जात असल्याने अनेक शेतकरी संभ्रमावस्थेत असल्याचे आंदोलकांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी राज्य किसान संघाचे अध्यक्ष बसवराज मोकाशी यांनी प्रशासनाने या प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, तर भविष्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/utara-samasyavarun-shetkaryanche-jilhadhikari-karyalayasamor-andolan/">उतारा समस्येवरून शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/utara-samasyavarun-shetkaryanche-jilhadhikari-karyalayasamor-andolan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>विविध मागण्यांसाठी बेळगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन</title>
		<link>https://news24tassmarathi.in/vividh-magnyansathi-belgaavat-uoos-utpadak-shetkaryanche-andolan/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/vividh-magnyansathi-belgaavat-uoos-utpadak-shetkaryanche-andolan/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 12 Jun 2026 17:00:26 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[dc office]]></category>
		<category><![CDATA[deputy commissioner]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[memorandum]]></category>
		<category><![CDATA[Protest]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17239</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव : शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य ऊस उत्पादक संघटनेच्या कुरुबर शांतकुमार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. खत वितरणातील अडचणींपासून ते ऊस<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/vividh-magnyansathi-belgaavat-uoos-utpadak-shetkaryanche-andolan/">विविध मागण्यांसाठी बेळगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्य ऊस उत्पादक संघटनेच्या कुरुबर शांतकुमार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. खत वितरणातील अडचणींपासून ते ऊस दर, सिंचन आणि डिझेल अनुदानापर्यंत विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.</p>
<p style="text-align: justify;">संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन खत वितरणासाठी लागू करण्यात आलेल्या ‘एफआयडी’ क्रमांकाच्या सक्तीमुळे अनेक शेतकऱ्यांना खत मिळण्यात अडथळे येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. ही अट तातडीने मागे घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी कृषी पंपसेटच्या संभाव्य खाजगीकरणास विरोध दर्शविण्यात आला. तसेच ऊसाला मिळणारा एफआरपी दर वैज्ञानिक निकषांवर आधारित पद्धतीने नव्याने निश्चित करावा, अशी मागणी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुरेश पाटील यांनी केली.</p>
<p style="text-align: justify;">शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात डिझेल उपलब्ध करून देणे, २०२५-२६ हंगामातील ऊस उत्पादकांची प्रलंबित थकबाकी तातडीने मंजूर करणे, तसेच रामदुर्ग आणि बादामी तालुक्यातील रखडलेल्या सिंचन योजनांची कामे पुन्हा सुरू करणे या मागण्यांचाही निवेदनात समावेश होता. सिंचन प्रकल्पांमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.</p>
<p style="text-align: justify;">या आंदोलनात राज्य ऊस उत्पादक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध भागांतील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/vividh-magnyansathi-belgaavat-uoos-utpadak-shetkaryanche-andolan/">विविध मागण्यांसाठी बेळगावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/vividh-magnyansathi-belgaavat-uoos-utpadak-shetkaryanche-andolan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पेरणी हंगामात बियाणे-खतांचा सुरळीत पुरवठा करा</title>
		<link>https://news24tassmarathi.in/perni-hangamat-biyane-khatancha-suralit-puravatha-kara/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/perni-hangamat-biyane-khatancha-suralit-puravatha-kara/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 29 May 2026 12:25:23 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[dc office]]></category>
		<category><![CDATA[deputy commissioner]]></category>
		<category><![CDATA[farmer]]></category>
		<category><![CDATA[memorandum]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16859</guid>

					<description><![CDATA[<p>काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी बेळगाव : ऐन पेरणी हंगामात बी-बियाणे आणि खतांचा तुटवडा निर्माण होत असल्याचा आरोप करत तसेच युरिया खताचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/perni-hangamat-biyane-khatancha-suralit-puravatha-kara/">पेरणी हंगामात बियाणे-खतांचा सुरळीत पुरवठा करा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> ऐन पेरणी हंगामात बी-बियाणे आणि खतांचा तुटवडा निर्माण होत असल्याचा आरोप करत तसेच युरिया खताचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा दावा करत शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने एडीसी बेळगाव यांना निवेदन सादर केले.</p>
<p style="text-align: justify;">निवेदनात म्हटले आहे की, अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध होत नसून काही विक्रेते कृत्रिम टंचाई निर्माण करून जादा दराने विक्री करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून बियाणे व खतांचा सुरळीत पुरवठा सुनिश्चित करावा, अशी मागणी करण्यात आली.</p>
<p style="text-align: justify;">तसेच कृषी सहायक संचालक (AD) आणि कृषी उपसंचालक (DD) यांनी नियमित तपासणी मोहीम राबवून खत व बियाण्यांचा काळाबाजार रोखावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही शिष्टमंडळाने केली.</p>
<p style="text-align: justify;">यावर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेण्यात येत असून बियाणे व खतांचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जातील, तसेच काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.</p>
<p style="text-align: justify;">या वेळी शेतकरी नेते प्रसाद पाटील यांच्यासह माजी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, माजी तालुका पंचायत सदस्य मारुती लोकूर, राजेंद्र पाटील, सुरेश जाधव, किरण लोंढे आणि इतर २५० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/perni-hangamat-biyane-khatancha-suralit-puravatha-kara/">पेरणी हंगामात बियाणे-खतांचा सुरळीत पुरवठा करा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/perni-hangamat-biyane-khatancha-suralit-puravatha-kara/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
