<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Maharashtra Archives | News 24 Tass Marathi</title>
	<atom:link href="https://news24tassmarathi.in/category/maharashtra/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://news24tassmarathi.in/category/maharashtra/</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Sun, 07 Jun 2026 13:13:59 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0</generator>

<image>
	<url>https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/07/android-chrome-192x192-nobg-75x75.png</url>
	<title>Maharashtra Archives | News 24 Tass Marathi</title>
	<link>https://news24tassmarathi.in/category/maharashtra/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा</title>
		<link>https://news24tassmarathi.in/jyeshtha-nete-sharad-pawar-yanchyashi-seemaprashni-madhyavarti-maharashtra-ekikaran-samityachya-shishtmandalachi-charcha/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/jyeshtha-nete-sharad-pawar-yanchyashi-seemaprashni-madhyavarti-maharashtra-ekikaran-samityachya-shishtmandalachi-charcha/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 07 Jun 2026 13:13:58 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[border dispute]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[mes]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17116</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव : महाराष्ट्र &#8211; कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला गती मिळावी आणि महाराष्ट्र सरकारने अधिक प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/jyeshtha-nete-sharad-pawar-yanchyashi-seemaprashni-madhyavarti-maharashtra-ekikaran-samityachya-shishtmandalachi-charcha/">ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> महाराष्ट्र &#8211; कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याच्या सुनावणीला गती मिळावी आणि महाराष्ट्र सरकारने अधिक प्रभावी पाठपुरावा करावा, अशी मागणी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली.</p>
<p style="text-align: justify;">कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पवार साहेबांची भेट घेऊन सीमाप्रश्नी सविस्तर चर्चा केली. यावेळी समितीच्या वतीने सीमाभागातील विविध प्रश्न तसेच सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या सद्यस्थितीची माहिती देण्यात आली.</p>
<p style="text-align: justify;">बैठकीदरम्यान २९ जून रोजी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आयोजित धरणे आंदोलनाची माहितीही शिष्टमंडळाने पवार साहेबांना दिली. यावर पवार साहेब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी तत्काळ चर्चा करून उच्चाधिकार समिती आणि तज्ज्ञ समितीची बैठक घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">बेळगावसह सीमाभागात कन्नड सक्तीच्या अंमलबजावणीमुळे मराठी भाषिकांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीबाबतही यावेळी चर्चा झाली. सीमाभागातील मराठी जनतेच्या भावना आणि स्थानिक परिस्थितीची माहिती शिष्टमंडळाने पवार साहेबांना दिली. सीमाप्रश्नावर झालेल्या चर्चेनंतर महाराष्ट्र सरकार सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, सर्वोच्च न्यायालयातील खटल्याचा युक्तिवाद प्रभावीपणे मांडण्यासाठी आवश्यक पावले उचलली जातील, अशी भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.</p>
<p style="text-align: justify;">या भेटी दरम्यान समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांच्यासह सुहास हुद्दार, उमेश पाटील आणि विनोद अंबेवाडीकर उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/jyeshtha-nete-sharad-pawar-yanchyashi-seemaprashni-madhyavarti-maharashtra-ekikaran-samityachya-shishtmandalachi-charcha/">ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी सीमाप्रश्नी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाची चर्चा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/jyeshtha-nete-sharad-pawar-yanchyashi-seemaprashni-madhyavarti-maharashtra-ekikaran-samityachya-shishtmandalachi-charcha/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सीमालढा अधिक तीव्र करणार</title>
		<link>https://news24tassmarathi.in/marathi-bhashikanchya-hakkansathi-seemaladha-adhik-tivra-karanar/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/marathi-bhashikanchya-hakkansathi-seemaladha-adhik-tivra-karanar/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 01 Jun 2026 08:40:34 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[border dispute]]></category>
		<category><![CDATA[hutamta din]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[mes]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16938</guid>

					<description><![CDATA[<p>म. ए. समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन भाषा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २२ जूननंतर आंदोलनाचा इशारा बेळगाव : सीमालढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करत मराठी भाषिकांच्या न्याय्य<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/marathi-bhashikanchya-hakkansathi-seemaladha-adhik-tivra-karanar/">मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सीमालढा अधिक तीव्र करणार</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>म. ए. समितीच्यावतीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन</strong> </span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>भाषा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी २२ जूननंतर आंदोलनाचा इशारा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> सीमालढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करत मराठी भाषिकांच्या न्याय्य हक्कांसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्याचा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा निकाल लागेपर्यंत मराठी भाषिकांवरील अन्याय सहन केला जाणार नाही, तसेच २२ जूनपर्यंत भाषा वापराबाबतच्या कायद्याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.</p>
<p style="text-align: justify;">महाराष्ट्र एकीकरण समिती आणि सीमाभागातील मराठी भाषिकांच्यावतीने १ जून हुतात्मा दिनानिमित्त हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात प्राणांचे बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या प्रतिमांना पुष्पहार व पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. “बेळगाव, खानापूर, निपाणी, बिदर-भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे” तसेच कन्नड सक्तीविरोधी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.</p>
<p style="text-align: justify;">आपल्या मनोगतात प्रकाश मरगाळे म्हणाले की, सीमालढ्यातील हुतात्म्यांचे बलिदान मराठी भाषिक कधीही विसरणार नाहीत. त्यांच्या त्यागामुळेच सीमाभागातील मराठी माणूस आजही आपल्या हक्कांसाठी लढत आहे. मराठी भाषिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने शक्य तितकी आंदोलने करून हा लढा पुढे नेला जाईल. सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना मराठी भाषिकांवर कोणत्याही प्रकारचा भाषिक अन्याय होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.</p>
<p style="text-align: justify;">ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारने सरकारी कार्यालये आणि खासगी संस्थांमध्ये ६० टक्के कन्नड व ४० टक्के इतर भाषांच्या वापरास परवानगी दिली आहे. मात्र, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे २२ जूनपर्यंत संबंधित कायद्याची अंमलबजावणी झाली नाही, तर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. तसेच सीमाप्रश्न निकाली निघेपर्यंत सर्व शासकीय कागदपत्रे कन्नडसोबत मराठीतही उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर यांनी सीमाप्रश्नासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांच्या बलिदानाचे स्मरण केले. सरकारने ६० टक्के कन्नड आणि ४० टक्के इतर भाषांच्या वापरास परवानगी दिली असतानाही बेळगाव महापालिकेकडून १०० टक्के कन्नडचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच्या निषेधार्थ २२ जून रोजी विराट मोर्चा काढण्यात येणार असून मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.</p>
<p style="text-align: justify;">खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील यांनी हुतात्म्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी आणि न्यायासाठी संघर्ष करा, असे आवाहन केले. शिवसेना नेते प्रकाश शिरोळकर यांनीही हुतात्म्यांना आदरांजली वाहत मराठी भाषिकांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सीमाभागातील जनतेसोबत ठामपणे उभा असल्याचे सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">कार्यक्रमाला मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे, सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष तथा माजी आमदार मनोहर किणेकर, शहर समितीचे अध्यक्ष रणजीत चव्हाण-पाटील, रमाकांत कोंडुसकर, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, आर. एम. चौगुले, सरस्वती पाटील, रवी साळुंके, आर. आय. पाटील, प्रकाश शिरोळकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी, शिवसेना कार्यकर्ते आणि मराठी भाषिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/marathi-bhashikanchya-hakkansathi-seemaladha-adhik-tivra-karanar/">मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी सीमालढा अधिक तीव्र करणार</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/marathi-bhashikanchya-hakkansathi-seemaladha-adhik-tivra-karanar/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>भावगीतांची सम्राज्ञी हरपली ; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन</title>
		<link>https://news24tassmarathi.in/bhavageetanchi-samragnyi-harapli-jyeshtha-parshvagayika-suman-kalyanpur-yanche-nidhan/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/bhavageetanchi-samragnyi-harapli-jyeshtha-parshvagayika-suman-kalyanpur-yanche-nidhan/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 31 May 2026 18:48:00 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Entertainement]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[Sad Demice]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16933</guid>

					<description><![CDATA[<p>संगीत क्षेत्रावर शोककळा मुंबई : भारतीय संगीतविश्वातील मधुर आणि सुरेल आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/bhavageetanchi-samragnyi-harapli-jyeshtha-parshvagayika-suman-kalyanpur-yanche-nidhan/">भावगीतांची सम्राज्ञी हरपली ; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>संगीत क्षेत्रावर शोककळा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> भारतीय संगीतविश्वातील मधुर आणि सुरेल आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने हिंदी आणि मराठी संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.</p>
<p style="text-align: justify;">१९५४ मध्ये पार्श्वगायिका म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या सुमन कल्याणपूर यांनी ६० आणि ७० च्या दशकात आपल्या अवीट गोड आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. मोहम्मद रफी, मुकेश, किशोर कुमार आणि मन्ना डे यांच्यासोबत त्यांनी अनेक अजरामर गीते गायली. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’ आणि ‘ना तुम हमें जानो’ यांसारखी त्यांची गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत.</p>
<p style="text-align: justify;">हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी भावसंगीतातही त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘शब्द शब्द जपून ठेव’, ‘केतकीच्या वनी येथे’, ‘पाखरा जा रे दूर देशी’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ यांसारख्या भावगीतांनी मराठी रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले.</p>
<p style="text-align: justify;">गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या आवाजाशी साधर्म्य असूनही सुमन कल्याणपूर यांनी आपल्या स्वतंत्र शैलीत आणि वैशिष्ट्यपूर्ण गायकीतून भारतीय संगीतविश्वात वेगळे स्थान निर्माण केले. मराठी, हिंदीसह विविध भारतीय भाषांमध्ये त्यांनी शेकडो गाणी गायली.</p>
<p style="text-align: justify;">भारतीय संगीत क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल केंद्र सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार आणि गदिमा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला होता. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रातील एक सुश्राव्य, अजरामर आणि भावस्पर्शी अध्याय कायमचा हरपला आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/bhavageetanchi-samragnyi-harapli-jyeshtha-parshvagayika-suman-kalyanpur-yanche-nidhan/">भावगीतांची सम्राज्ञी हरपली ; ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/bhavageetanchi-samragnyi-harapli-jyeshtha-parshvagayika-suman-kalyanpur-yanche-nidhan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>महाराष्ट्र एकीकरण समितीला आंदोलनाची गरज भासू देणार नाही</title>
		<link>https://news24tassmarathi.in/maharashtra-ekikaran-samitila-andolanachi-garaj-bhasu-denar-nahi/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/maharashtra-ekikaran-samitila-andolanachi-garaj-bhasu-denar-nahi/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 31 May 2026 10:46:17 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[border dispute]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[mes]]></category>
		<category><![CDATA[Political]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16915</guid>

					<description><![CDATA[<p>मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक असून महाराष्ट्र एकीकरण समितीला मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, असे<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/maharashtra-ekikaran-samitila-andolanachi-garaj-bhasu-denar-nahi/">महाराष्ट्र एकीकरण समितीला आंदोलनाची गरज भासू देणार नाही</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र सरकार सकारात्मक असून महाराष्ट्र एकीकरण समितीला मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही, असे ठाम आश्वासन महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिले. आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत समितीची बैठक घडवून आणण्यासाठी आपण स्वतः समन्वयक म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p style="text-align: justify;">रविवारी बेळगाव दौऱ्यावर आलेल्या उदय सामंत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या बेळगाव सीमाप्रश्नाच्या खटल्याची लवकर सुनावणी व्हावी आणि महाराष्ट्र सरकारने यासाठी अधिक सक्रिय भूमिका घ्यावी, अशी मागणी केली.</p>
<p style="text-align: justify;">यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सामंत यांनी सांगितले की, महाराष्ट्रात २३ ते २५ जूनदरम्यान विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने तातडीने बैठक घेणे शक्य नाही. मात्र आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक आयोजित करण्यासाठी आपण समन्वयक म्हणून काम करणार आहोत. समितीच्या सर्व मागण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचवून त्यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">समितीने २९ जून रोजी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र सरकारकडून सकारात्मक भूमिका घेण्यात येत असल्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे आंदोलन सध्या स्थगित करण्यात आल्याची माहिती सामंत यांनी दिली. मराठी भाषिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी सरकार कटिबद्ध असून आंदोलनाची वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी नमूद केले.</p>
<p style="text-align: justify;">सीमाप्रश्नाबाबत बोलताना सामंत म्हणाले की, कर्नाटक सरकारवर टीका करणे हा आपल्या दौऱ्याचा उद्देश नसून सीमाभागातील मराठी भाषिकांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि त्या योग्य पातळीवर मांडणे हा हेतू आहे. मराठी भाषा मंत्री म्हणून आपण कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची भेट घेऊन मराठी भाषिकांच्या समस्या मांडणार आहोत. तसेच मराठी भाषिकांवर कन्नड भाषेची सक्ती होऊ नये, अशी विनंतीही कर्नाटक सरकारकडे केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी त्यांनी आपल्या दौऱ्यादरम्यान कर्नाटक सरकारने दिलेल्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल आभार व्यक्त केले. सीमाभागातील नागरिकांशी सातत्याने संपर्क ठेवला जाईल आणि लवकरच संबंधित मंत्र्यांसह पुन्हा सीमाभागाचा दौरा केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/maharashtra-ekikaran-samitila-andolanachi-garaj-bhasu-denar-nahi/">महाराष्ट्र एकीकरण समितीला आंदोलनाची गरज भासू देणार नाही</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/maharashtra-ekikaran-samitila-andolanachi-garaj-bhasu-denar-nahi/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>धाराशिवच्या संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार</title>
		<link>https://news24tassmarathi.in/dharashivchya-sammelanat-seemabhagacha-buland-hunkar/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/dharashivchya-sammelanat-seemabhagacha-buland-hunkar/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 30 May 2026 17:06:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[border dispute]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[marathi sahitya samelan]]></category>
		<category><![CDATA[Usmanabad]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16891</guid>

					<description><![CDATA[<p>मराठी भाषा, संस्कृती आणि सीमावासीयांच्या न्यायहक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी धाराशिव : अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/dharashivchya-sammelanat-seemabhagacha-buland-hunkar/">धाराशिवच्या संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>मराठी भाषा, संस्कृती आणि सीमावासीयांच्या न्यायहक्कांचा मुद्दा केंद्रस्थानी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>धाराशिव :</strong> अखिल भारतीय साहित्य परिषदेतर्फे आयोजित ३२ वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन २०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. साहित्य, संस्कृती आणि मराठी अस्मितेच्या विविध पैलूंना उजाळा देणाऱ्या या संमेलनात सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांनाही प्रभावीपणे वाचा फोडण्यात आली.</p>
<p style="text-align: justify;">संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि स्वागताध्यक्ष आमदार कैलासदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात मराठी साहित्याच्या विविध प्रवाहांचे दर्शन घडले. यावेळी बोलताना आमदार कैलासदादा पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. मराठी भाषा, संस्कृती आणि स्वाभिमानाच्या जतनासाठी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सामूहिक भूमिका घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सीमावासीयांच्या न्याय्य हक्कांसाठी आपण ठामपणे उभे राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.</p>
<p style="text-align: justify;">संमेलनाच्या समारोप सत्रात आयोजित काव्यमैफलीने विशेष लक्ष वेधून घेतले. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी आपल्या प्रभावी सूत्रसंचालनातून कार्यक्रमाला वेगळीच रंगत आणली. काव्य हे केवळ अभिव्यक्तीचे माध्यम नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.</p>
<p style="text-align: justify;">या काव्यमैफलीत अखिल भारतीय साहित्य परिषद, कर्नाटक राज्य शाखेच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील १२ आणि बिदर जिल्ह्यातील ५ कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला. त्यांच्या कवितांमधून सीमाभागातील मराठी समाजाच्या भावना, संघर्ष, अस्मिता आणि अपेक्षा यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले.</p>
<p style="text-align: justify;">कर्नाटक राज्याध्यक्ष तसेच सीमाकवी रवींद्र पाटील यांनी सादर केलेल्या ‘माय’ आणि ‘लढा’ या कवितांना विशेष प्रतिसाद मिळाला. ‘माय’ या कवितेत महाराष्ट्र आणि सीमाभागातील नाते भावनिक स्वरूपात मांडण्यात आले, तर ‘लढा’ या कवितेत न्याय, स्वाभिमान आणि अस्मितेसाठी सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिबिंब उमटले. त्यांच्या सादरीकरणाला उपस्थितांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली.</p>
<p style="text-align: justify;">याशिवाय किरण पाटील, रोशनी हुंद्रे, अपर्णा पाटील, संजीवनी खंडागळे, स्मिता आळतेकर, अशोक सुतार, चंद्रशेखर गायकवाड, पूजा सुतार, मनीषा नाडगौडा आणि स्नेहल बर्डे यांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि मानवी विषयांवर आधारित कविता सादर केल्या.</p>
<p>सीमाभागातील कवी-कवयित्रींच्या सशक्त अभिव्यक्तीमुळे संमेलनात मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि न्यायाच्या लढ्याचा ठसा उमटला. साहित्याच्या माध्यमातून समाजातील प्रश्न मांडण्याची आणि जनजागृती घडवून आणण्याची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/dharashivchya-sammelanat-seemabhagacha-buland-hunkar/">धाराशिवच्या संमेलनात सीमाभागाचा बुलंद हुंकार</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/dharashivchya-sammelanat-seemabhagacha-buland-hunkar/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे</title>
		<link>https://news24tassmarathi.in/kannad-sakti-andolanatil-hutatmyanna-abhivadan-karanyasathi-mothyya-sankhyene-upasthit-rahave/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/kannad-sakti-andolanatil-hutatmyanna-abhivadan-karanyasathi-mothyya-sankhyene-upasthit-rahave/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 27 May 2026 16:12:09 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[border dispute]]></category>
		<category><![CDATA[hutamta din]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[meeting]]></category>
		<category><![CDATA[mes]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16809</guid>

					<description><![CDATA[<p>महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/kannad-sakti-andolanatil-hutatmyanna-abhivadan-karanyasathi-mothyya-sankhyene-upasthit-rahave/">कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे आवाहन</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल टिळकवाडी बेळगाव येथे अध्यक्ष अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.</p>
<p style="text-align: justify;">बैठकीच्या सुरवातीला मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, ज्येष्ठ नेते अर्जुन गोरल तसेच इतर समिती कार्यकर्त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अध्यक्ष अंकुश केसरकर म्हणाले कर्नाटक शासनाने डॉ. गोकाक अहवाल मान्य केल्यानंतर सर्व ठिकाणी कन्नड भाषा सक्ती करण्यास सुरवात केली. त्याला विरोध करण्यासाठी समितीच्या वतीने सत्याग्रहाच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे जाहीर करण्यात आले. १ जून १९८६ रोजी मा. शरद पवार गनिमी काव्याने कित्तूर राणी चन्नमा चौकात दाखल झाले आणि त्यांनी सत्याग्रह केला. महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगाव बंदी असून देखील सत्याग्रह यशस्वी झाल्याने प्रशासनाने शरद पवाराना अटक केली, ही बातमी सर्वदूर सीमाभागात पसरली लोक रस्त्यावर उतरून निदर्शने करू लागली बेळगावात हरताळ पाळला गेला, परिस्थिती स्पोटक बनली, आंदोलकांवर गोळीबार झाला या गोळीबारात नऊ निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य आले. शिवाय कित्येक कार्यकर्त्यांना अटक करून वेगवेगळ्या तुरुंगात डांबण्यात आले. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून सीमाप्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध रहाणे गरजेचे आहे.</p>
<p>यावर्षी सोमवार दिनांक १ जून रोजी सकाळी ८.३० वाजता हुतात्मा स्मारक हिंडलगा हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे तरी सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन केले.</p>
<ul style="text-align: justify;">
<li><span style="color: #000000;"><strong>शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा निर्णय :</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;">दरवर्षी प्रमाणे युवा समितीच्या वतीने मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येते. यावर्षी उपक्रमाचे हे नववे वर्ष असून यावर्षी ३०० शाळांना ही साहित्य वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.</p>
<ul style="text-align: justify;">
<li><strong>दहावीच्या गुणवंतांचा होणार सत्कार :</strong></li>
</ul>
<p style="text-align: justify;">युवा समितीच्या वतीने येणाऱ्या जुलै महिन्यात मराठी माध्यमातील १० वी मध्ये बेळगाव शहर, बेळगाव तालुका आणि खानापूर विभागातील पहिला दुसरा आणि तिसरा क्रमांक आलेल्या विद्यार्थांचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला.</p>
<p style="text-align: justify;">सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, अक्षय बांबरकर, सुरज चव्हाण, महांतेश अलगोंडी, अश्वजीत चौधरी, रोहन कुंडेकर, आनंद पाटील, आकाश भेकणे, आशिष कोचेरी, प्रकाश हेब्बाजी आदी उपस्थित होते. चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/kannad-sakti-andolanatil-hutatmyanna-abhivadan-karanyasathi-mothyya-sankhyene-upasthit-rahave/">कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/kannad-sakti-andolanatil-hutatmyanna-abhivadan-karanyasathi-mothyya-sankhyene-upasthit-rahave/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सावंतवाडी &#8211; चंदगड &#8211; बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा</title>
		<link>https://news24tassmarathi.in/sawantwadi-chandgad-belgaav-pralambit-railway-margache-kam-tatadine-suru-kara/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/sawantwadi-chandgad-belgaav-pralambit-railway-margache-kam-tatadine-suru-kara/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 21 May 2026 03:49:04 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[Chandgad]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Kokan]]></category>
		<category><![CDATA[Kolhapur]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[railway]]></category>
		<category><![CDATA[Sawantwadi]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16620</guid>

					<description><![CDATA[<p>कोल्हापूर : देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/sawantwadi-chandgad-belgaav-pralambit-railway-margache-kam-tatadine-suru-kara/">सावंतवाडी &#8211; चंदगड &#8211; बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> देशातील वाढती इंधन आयात, परकीय चलनाची घसरण आणि वाहतुकीच्या समस्यांवर मात करण्यासाठी कोल्हापूर व कोकण विभागातील प्रलंबित रेल्वे मार्ग तातडीने विकसित करण्यात यावेत, अशी मागणी &#8216;कोल्हापूर जिल्हा रहिवासी सामाजिक प्रवासी संघ&#8217; यांच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका पत्राद्वारे करण्यात आली आहे.​</p>
<p style="text-align: justify;">प्रवासी संघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना म्हटले आहे की, सध्या मुंबई-पुणे-कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांदरम्यान रोज हजारो खाजगी वाहनांमुळे लाखो लीटर पेट्रोल व डिझेल वाया जात असून अब्जावधी रुपयांचे परकीय चलन देशाबाहेर जात आहे. &#8216;शक्तीपीठ महामार्ग&#8217; सारख्या प्रकल्पांवर लाखो कोटी रुपये खर्च केले जात असले, तरी त्यामुळे भविष्यात परकीय इंधनावरील अवलंबित्व कमी होणार नाही. याला उत्तम पर्याय म्हणून १) कोल्हापूर &#8211; आजरा &#8211; गडहिंग्लज &#8211; चंदगड &#8211; बेळगाव, २) सावंतवाडी &#8211; चंदगड &#8211; बेळगाव आणि ३) कोल्हापूर &#8211; वैभववाडी या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गांचे नियोजन मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या धर्तीवर जलद गतीने करून पुढील पाच वर्षांत ते प्रत्यक्ष पूर्ण करावेत, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/sawantwadi-chandgad-belgaav-pralambit-railway-margache-kam-tatadine-suru-kara/">सावंतवाडी &#8211; चंदगड &#8211; बेळगाव प्रलंबित रेल्वे मार्गाचे काम तातडीने सुरू करा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/sawantwadi-chandgad-belgaav-pralambit-railway-margache-kam-tatadine-suru-kara/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ</title>
		<link>https://news24tassmarathi.in/bengaluru-belgaav-mumbai-navya-railvesevecha-shubharambh/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/bengaluru-belgaav-mumbai-navya-railvesevecha-shubharambh/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 17 May 2026 13:37:03 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[Bengaluru]]></category>
		<category><![CDATA[inauguration]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[railway]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16518</guid>

					<description><![CDATA[<p>रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा बेळगाव : बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/bengaluru-belgaav-mumbai-navya-railvesevecha-shubharambh/">बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>रेल्वेमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> बेंगळुरू ते मुंबईदरम्यान सुरू करण्यात आलेल्या नव्या रेल्वेसेवेचे उद्घाटन केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी व्हर्च्युअल माध्यमातून हिरवा झेंडा दाखवून केले. बेळगावमार्गे धावणारी ही रेल्वेसेवा कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी महत्त्वाची ठरणार असून, दोन्ही राज्यांतील संपर्क अधिक मजबूत होणार आहे.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी दक्षिण आणि उत्तर कर्नाटकातील रेल्वेसंबंधित अनेक प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले. तसेच बेंगळुरू-मुंबई मार्गावर लवकरच वंदे भारत स्लीपर सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.</p>
<p style="text-align: justify;">कर्नाटकमधील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक सुरू असल्याचे सांगताना त्यांनी ‘अमृत भारत स्टेशन योजना’ अंतर्गत राज्यातील ६१ रेल्वे स्थानकांचा सुमारे २,१६० कोटी रुपयांच्या खर्चातून पुनर्विकास सुरू असल्याची माहिती दिली. त्यापैकी नऊ स्थानकांचे काम पूर्ण झाले असून, बेंगळुरू कॅन्टोन्मेंट स्थानकाचा ४८५ कोटी रुपये आणि यशवंतपूर स्थानकाचा ३६७ कोटी रुपयांत विकास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.</p>
<p style="text-align: justify;">२०१४ नंतर कर्नाटकमध्ये सुमारे १,७५० किलोमीटर नवीन रेल्वेमार्ग उभारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हासन-मंगळुरू विभागातील विद्युतीकरण पूर्णत्वाच्या टप्प्यात असून त्याची चाचणी सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.</p>
<p style="text-align: justify;">बेंगळुरू उपनगरी रेल्वे प्रकल्पातील चारही कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बैयप्पनहळ्ळी-चिक्कबनवारा आणि हिलालिगे-राजानुकुंटे मार्गांसाठी जमीन संपादन प्रक्रिया पूर्ण झाली असून, केएसआर बेंगळुरू-देवनहळ्ळी आणि केंगेरी-व्हाईटफिल्ड मार्गांनाही मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकल्पामुळे विमानतळ, इलेक्ट्रॉनिक सिटी, मराठहळ्ळी आणि हेब्बळ यांसारख्या प्रमुख भागांना रेल्वे जोडणी मिळणार आहे.</p>
<p style="text-align: justify;">कर्नाटकमध्ये सध्या १२ जोड्या वंदे भारत गाड्या कार्यरत असून, बेंगळुरू-मंगळुरू मार्गावरील चाचण्या सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच बेंगळुरू-हैदराबाद आणि बेंगळुरू-चेन्नई बुलेट ट्रेन कॉरिडॉरलाही मंजुरी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.</p>
<p style="text-align: justify;">या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री व्ही. सोमण्णा यांनीही उपस्थितांना संबोधित केले. एसएमव्हीटी बेंगळुरू-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्रमांक १६५५३/५४) सुरू केल्याबद्दल त्यांनी रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले. देशातील व्यस्त रेल्वेमार्गांपैकी एका मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा दिलासादायक ठरेल, असे ते म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">थानिसंद्रा येथे सुमारे २७० कोटी रुपयांचा वंदे भारत स्लीपर देखभाल डेपो उभारण्यात येणार असून, एसएमव्हीटी बेंगळुरू येथे ५२.७३ कोटी रुपयांचा चेअर कार देखभाल प्रकल्प उभारला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.</p>
<p style="text-align: justify;">कार्यक्रमाला खासदार पी. सी. मोहन, लहर सिंग सिरोया आणि तेजस्वी सूर्या हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. तसेच बेंगळुरू विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आशुतोष कुमार सिंह आणि दक्षिण पश्चिम रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/bengaluru-belgaav-mumbai-navya-railvesevecha-shubharambh/">बेंगळुरू- बेळगाव- मुंबई नव्या रेल्वेसेवेचा शुभारंभ</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/bengaluru-belgaav-mumbai-navya-railvesevecha-shubharambh/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बेळगाव महापालिकेत सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/belgaav-mahapaliket-seemaprashnachya-muddyavarun-jordar-khadajangi/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/belgaav-mahapaliket-seemaprashnachya-muddyavarun-jordar-khadajangi/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 13 May 2026 16:16:57 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[border dispute]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[meeting]]></category>
		<category><![CDATA[municipal corporation]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16409</guid>

					<description><![CDATA[<p>महाजन अहवालाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि समिती नगरसेवक आमने सामने बेळगाव : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सीमाप्रश्न आणि महाजन अहवालाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी गट तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांमध्ये<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/belgaav-mahapaliket-seemaprashnachya-muddyavarun-jordar-khadajangi/">बेळगाव महापालिकेत सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>महाजन अहवालाच्या ठरावावरून सत्ताधारी आणि समिती नगरसेवक आमने सामने</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सीमाप्रश्न आणि महाजन अहवालाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी गट तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. सीमावादाचा विषय न्यायालयात प्रलंबित असताना यासंदर्भात सभागृहात ठराव मांडता येईल का, याबाबत राज्य सरकारचे मत जाणून घेण्याचा निर्णय घेण्यात आला.</p>
<p style="text-align: justify;">बेळगाव सीमावादावर महाजन अहवाल अंतिम मानावा, असा ठराव मंजूर करण्याची मागणी विविध कन्नड संघटनांकडून करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर असा ठराव महापालिकेत मांडणे कायदेशीरदृष्ट्या योग्य ठरेल का, याची स्पष्टता मिळवण्यासाठी राज्य सरकारला पत्र पाठवण्याचे निर्देश महापौर प्रीती कामकर यांनी दिले.</p>
<p style="text-align: justify;">महापौर प्रीती कामकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सुरुवातीलाच नामनिर्देशित सदस्य रमेश सोंटक्की यांनी २५ हून अधिक कन्नड संघटनांच्या निवेदनाचा उल्लेख करत महाजन अहवाल अंतिम असल्याचा ठराव मंजूर करण्याची मागणी केली. या मागणीला महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे आणि शिवाजीराव मंडोळकर यांनी जोरदार विरोध केला.</p>
<p style="text-align: justify;">सीमावादाचा मुद्दा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा करणेही योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर विधी अधिकाऱ्यांनीही न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने हा विषय सभागृहात मांडता येणार नसल्याचे मत व्यक्त केले.</p>
<p style="text-align: justify;">मात्र, रमेश सोंटक्की यांनी या मताला आक्षेप घेत, प्रकरण अद्याप सुनावणीस आलेले नसल्यामुळे ठराव मांडण्यात अडचण नसल्याचा दावा केला. दरम्यान, महापौर प्रीती कामकर यांनी महानगरपालिका कन्नड भाषेच्या संरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कन्नड संघटनांच्या निवेदनाचा विचार करून राज्य सरकारकडून अभिप्राय मागविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी जाहीर केले.</p>
<p style="text-align: justify;">महापौरांनी हा निर्णय सर्वानुमते घेतल्याचे सांगताच रवी साळुंखे आणि शिवाजीराव मंडोळकर यांनी त्यास विरोध दर्शवला. हा निर्णय एकमताने झालेला नसून आम्ही त्याला विरोध करीत आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर या विषयावर थेट मतदान घेण्याची मागणी करण्यात आली. सत्ताधारी पक्षाचे नेते संतोष पडणेकर यांनीही मतदानासाठी तयारी दर्शवल्याने सभागृहातील वातावरण आणखी तापले.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/belgaav-mahapaliket-seemaprashnachya-muddyavarun-jordar-khadajangi/">बेळगाव महापालिकेत सीमाप्रश्नाच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/belgaav-mahapaliket-seemaprashnachya-muddyavarun-jordar-khadajangi/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान</title>
		<link>https://news24tassmarathi.in/maulinchya-manachya-ashwanche-27-junla-ankalihun-aalandikade-prasthan/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/maulinchya-manachya-ashwanche-27-junla-ankalihun-aalandikade-prasthan/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 12 May 2026 05:59:10 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ashadhi wari]]></category>
		<category><![CDATA[Chikkodi]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Pandharpur]]></category>
		<category><![CDATA[Pune]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16377</guid>

					<description><![CDATA[<p>अंकली : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या मानाच्या अश्वांचे अंकली येथून आळंदीकडे प्रस्थान २७ जून रोजी होणार असल्याची माहिती उर्जितसिंगराजे शितोळे सरकार यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/maulinchya-manachya-ashwanche-27-junla-ankalihun-aalandikade-prasthan/">माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>अंकली :</strong> आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माऊलींच्या मानाच्या अश्वांचे अंकली येथून आळंदीकडे प्रस्थान २७ जून रोजी होणार असल्याची माहिती उर्जितसिंगराजे शितोळे सरकार यांनी दिली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तिभावात हा पारंपरिक सोहळा पार पडणार आहे. </p>
<p style="text-align: justify;">आळंदी ते पंढरपूर वारीतील मानाच्या अश्वांची परंपरा शितोळे घराण्याकडे असून, अनेक वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. यंदाचे वारीचे १९४ वे वर्ष असून त्यानिमित्त आवश्यक नियोजन करण्यात आले आहे. शनिवार, २७ जून रोजी सकाळी दहा वाजता अंकली येथील शितोळे सरकार राजवाड्यातून मानाच्या अश्वांचे प्रस्थान होणार आहे. या वेळी वारकरी, ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. अंकली ते आळंदी हा प्रवास सुमारे अकरा दिवसांचा असणार असून अश्वांसोबत २० ते २५ जणांचा लवाजमा सहभागी होणार आहे. ७ जुलै रोजी हे अश्व आळंदी येथे पोहोचतील.</p>


<p class="wp-block-paragraph"></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/maulinchya-manachya-ashwanche-27-junla-ankalihun-aalandikade-prasthan/">माऊलींच्या मानाच्या अश्वांचे २७ जूनला अंकलीहून आळंदीकडे प्रस्थान</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/maulinchya-manachya-ashwanche-27-junla-ankalihun-aalandikade-prasthan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
