<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>Maharashtra Archives | News 24 Tass Marathi</title>
	<atom:link href="https://news24tassmarathi.in/category/maharashtra/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://news24tassmarathi.in/category/maharashtra/</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Thu, 23 Jul 2026 05:47:03 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0.2</generator>

<image>
	<url>https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/07/android-chrome-192x192-nobg-75x75.png</url>
	<title>Maharashtra Archives | News 24 Tass Marathi</title>
	<link>https://news24tassmarathi.in/category/maharashtra/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>आषाढी एकादशीनिमित्त धारवाड &#8211; बेळगाव &#8211; पंढरपूर विशेष रेल्वेला आजपासून सुरुवात</title>
		<link>https://news24tassmarathi.in/ashadhi-ekadashinimitta-dharwad-belgaav-pandharpur-vishesh-railwayla-ajpasun-suruvat/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/ashadhi-ekadashinimitta-dharwad-belgaav-pandharpur-vishesh-railwayla-ajpasun-suruvat/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 23 Jul 2026 05:47:02 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Ashadi Ekadashi]]></category>
		<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[Dharwad]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Pandharpur]]></category>
		<category><![CDATA[railway]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18399</guid>

					<description><![CDATA[<p>२३ ते २८ जुलैदरम्यान सहा फेऱ्या बेळगावसह उत्तर कर्नाटकातील भाविकांना मोठा दिलासा बेळगाव : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून धारवाड-बेळगाव-पंढरपूर विशेष रेल्वे आजपासून<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ashadhi-ekadashinimitta-dharwad-belgaav-pandharpur-vishesh-railwayla-ajpasun-suruvat/">आषाढी एकादशीनिमित्त धारवाड &#8211; बेळगाव &#8211; पंढरपूर विशेष रेल्वेला आजपासून सुरुवात</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>२३ ते २८ जुलैदरम्यान सहा फेऱ्या</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>बेळगावसह उत्तर कर्नाटकातील भाविकांना मोठा दिलासा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी दक्षिण पश्चिम रेल्वेकडून धारवाड-बेळगाव-पंढरपूर विशेष रेल्वे आजपासून सुरू करण्यात आली आहे. बेळगाव, धारवाड, हुबळी आणि परिसरातील हजारो भाविकांची दरवर्षी होणारी गैरसोय लक्षात घेऊन ही विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, २३ ते २८ जुलैदरम्यान ही रेल्वे एकूण सहा फेऱ्या करणार आहे.</p>
<p style="text-align: justify;">या विशेष रेल्वेत एकूण १० डबे असून त्यापैकी ८ जनरल आणि २ स्लीपर कोचचा समावेश आहे. बेळगावहून पंढरपूरसाठी थेट रेल्वेची अनेक वर्षांपासून मागणी होत होती. या विशेष सेवेच्या माध्यमातून भाविकांना अधिक सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे.</p>
<p style="text-align: justify;">सकाळी ६ वाजता धारवाड येथून सुटणारी विशेष एक्स्प्रेस सकाळी ७.४९ वाजता खानापूर, ८.३० वाजता बेळगाव, ९.३० वाजता घटप्रभा, दुपारी १२.२० वाजता मिरज येथे पोहोचून सायंकाळी ४.५० वाजता पंढरपूर येथे दाखल होईल.</p>
<p style="text-align: justify;">परतीच्या प्रवासात ही रेल्वे सायंकाळी ६.४० वाजता पंढरपूरहून सुटेल. त्यानंतर मध्यरात्री १.२० वाजता बेळगावला, तर पहाटे ४.३० वाजता धारवाडला पोहोचणार आहे.</p>
<p style="text-align: justify;">ही विशेष रेल्वे धारवाड, लोंढा, खानापूर, देसूर, बेळगाव, पाच्छापूर, गोकाक रोड, घटप्रभा, चिकोडी रोड, रायबाग, कुडची, उगार, शेडबाळ, विजापूर, मिरज, अरग, सांगोला आणि पंढरपूर या स्थानकांवर थांबणार असल्याने उत्तर कर्नाटकातील तसेच सीमाभागातील भाविकांना याचा मोठा लाभ होणार आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ashadhi-ekadashinimitta-dharwad-belgaav-pandharpur-vishesh-railwayla-ajpasun-suruvat/">आषाढी एकादशीनिमित्त धारवाड &#8211; बेळगाव &#8211; पंढरपूर विशेष रेल्वेला आजपासून सुरुवात</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/ashadhi-ekadashinimitta-dharwad-belgaav-pandharpur-vishesh-railwayla-ajpasun-suruvat/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ</title>
		<link>https://news24tassmarathi.in/adamapur-balumama-devsthanatil-60-75-kotinchya-arthik-gairvyavharane-jilhyat-khalbal/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/adamapur-balumama-devsthanatil-60-75-kotinchya-arthik-gairvyavharane-jilhyat-khalbal/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 21 Jul 2026 05:09:42 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Bhudargad]]></category>
		<category><![CDATA[fraud]]></category>
		<category><![CDATA[Kolhapur]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[temple]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18336</guid>

					<description><![CDATA[<p>भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल कोल्हापूर : महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/adamapur-balumama-devsthanatil-60-75-kotinchya-arthik-gairvyavharane-jilhyat-khalbal/">आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>भुदरगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>कोल्हापूर :</strong> महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि मध्य प्रदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आदमापूर (ता. भुदरगड) येथील सद्गुरू बाळूमामा देवस्थानाच्या आर्थिक व्यवहारांतील तब्बल ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपयांच्या कथित गैरव्यवहारप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.</p>
<p style="text-align: justify;">या प्रकरणात तत्कालीन निरीक्षक तथा कार्याध्यक्ष रागिणी झुंजारराव खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी यांच्यासह संबंधित विश्वस्त, कंत्राटदार, व्यापारी आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे.</p>
<p style="text-align: justify;">प्राथमिक माहितीनुसार, मार्च २०२० ते मार्च २०२६ या कालावधीत देवस्थान समितीच्या आर्थिक व्यवहारांमध्ये संगनमत करून निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप आहे. या गैरव्यवहारासाठी बनावट कागदपत्रे तयार करणे, विश्वासघात, फसवणूक तसेच पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.</p>
<p style="text-align: justify;">तपासात संबंधितांनी संगनमताने आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, याप्रकरणी तत्कालीन कार्याध्यक्ष रागिणी खडके, सचिव रावसाहेब कोणकेरी तसेच इतर संबंधित विश्वस्त, व्यापारी, कंत्राटदार आणि मध्यस्थांना आरोपी करण्यात आले आहे.</p>
<p style="text-align: justify;">आरोपींविरुद्ध फसवणूक, विश्वासघात, बनावट कागदपत्रे तयार करणे व त्यांचा वापर करणे तसेच गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कथित गैरव्यवहाराची एकूण रक्कम ६० कोटी ७५ लाख २८ हजार ६० रुपये असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/adamapur-balumama-devsthanatil-60-75-kotinchya-arthik-gairvyavharane-jilhyat-khalbal/">आदमापूर बाळूमामा देवस्थानातील ६०.७५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहाराने जिल्ह्यात खळबळ</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/adamapur-balumama-devsthanatil-60-75-kotinchya-arthik-gairvyavharane-jilhyat-khalbal/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>विठ्ठल दर्शनाची प्रतीक्षा आता चार तासांवर</title>
		<link>https://news24tassmarathi.in/vitthal-darshanachi-pratiksha-ata-char-tasanvar/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/vitthal-darshanachi-pratiksha-ata-char-tasanvar/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 19 Jul 2026 06:18:07 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ashadhi wari]]></category>
		<category><![CDATA[Ashadi Ekadashi]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Pandharpur]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18324</guid>

					<description><![CDATA[<p>व्हीआयपी दर्शन बंदचा सकारात्मक परिणाम आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी भाविकांना जलद दर्शनासाठी सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या सूचना पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/vitthal-darshanachi-pratiksha-ata-char-tasanvar/">विठ्ठल दर्शनाची प्रतीक्षा आता चार तासांवर</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><strong><span style="color: #ff0000;">व्हीआयपी दर्शन बंदचा सकारात्मक परिणाम</span></strong></li>
<li style="text-align: justify;"><strong><span style="color: #ff0000;">आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी</span></strong></li>
<li style="text-align: justify;"><strong><span style="color: #ff0000;">भाविकांना जलद दर्शनासाठी सुरक्षाव्यवस्था आणखी मजबूत करण्याच्या सूचना</span></strong></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>पंढरपूर :</strong> श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्यात आल्याने दर्शनरांगेतील भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पूर्वी पदस्पर्श दर्शनासाठी आठ ते दहा तास प्रतीक्षा करावी लागत असताना आता ही प्रतीक्षा सुमारे चार तासांवर आली असून भाविकांना अधिक सुलभ आणि जलद दर्शनाचा लाभ मिळत आहे.</p>
<p style="text-align: justify;">२५ जुलै रोजी होणाऱ्या आषाढी शुद्ध एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन दर्शनरांगेतील भाविकांना कोणताही अडथळा न येता दर्शन मिळावे, यासाठी राज्य शासनाच्या निर्णयानुसार आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी व्हीआयपी दर्शन सुविधा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.</p>
<p style="text-align: justify;">या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी होत आहे का, याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी स्वेरी महाविद्यालयापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापर्यंत पायी पाहणी केली. यावेळी त्यांनी मंदिर समितीने दर्शनरांग आणि पत्राशेड परिसरात भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा आढावा घेतला.</p>
<p style="text-align: justify;">दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी संवाद साधत त्यांनी दर्शन व्यवस्थेबाबत तसेच उपलब्ध सुविधांबाबत प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली. दर्शनरांगेत घुसखोरी होऊ नये, यासाठी आवश्यक त्या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करून व्यवस्था अधिक काटेकोर करण्याच्या सूचनाही त्यांनी मंदिर समितीला दिल्या.</p>
<p style="text-align: justify;">व्हीआयपी दर्शन बंद झाल्यामुळे सामान्य भाविकांना जलद दर्शन मिळत असल्याचे समाधान अनेकांनी व्यक्त केले असून, आषाढी यात्रेदरम्यानही ही व्यवस्था प्रभावीपणे कायम ठेवण्याची अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/vitthal-darshanachi-pratiksha-ata-char-tasanvar/">विठ्ठल दर्शनाची प्रतीक्षा आता चार तासांवर</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/vitthal-darshanachi-pratiksha-ata-char-tasanvar/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोपकडे वळवण्याची मागणी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 17 Jul 2026 13:49:50 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[Chandgad]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Kolhapur]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[memorandum]]></category>
		<category><![CDATA[rakaskop dam]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18265</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन बेळगाव : शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी जलाशयातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याच्या<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/">तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोपकडे वळवण्याची मागणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी जलाशयातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याच्या प्रस्तावाला नव्याने गती मिळाली आहे. या मागणीसंदर्भात बेळगावच्या माजी नगरसेवकांच्या संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या प्रस्तावाबाबत खासदार शेट्टर यांनी सकारात्मक भूमिका घेत पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.</p>
<p style="text-align: justify;">सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. दरवर्षी मे ते जुलै या कालावधीत राकसकोप आणि हिडकल जलाशयांतील पाणीसाठा कमी झाल्याने बेळगाव शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून चंदगड तालुक्यातील तिलारी जलाशय आणि राकसकोप जलाशय यांची &#8216;राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पा&#8217;अंतर्गत जोडणी करण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली.</p>
<p style="text-align: justify;">माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव सुंठकर यांनी सांगितले की, तिलारी जलाशयात वीज निर्मितीनंतर मे ते जुलै या काळात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी उपलब्ध असते. हे पाणी राकसकोप जलाशयात वळविल्यास बेळगाव शहरासह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. याशिवाय मार्कंडेय नदीच्या पात्रातून शेतीसाठीही या पाण्याचा लाभ होईल.</p>
<p style="text-align: justify;">माजी नगरसेवक लतीफ खान पठाण यांनी सांगितले की, या योजनेसाठी यापूर्वीही विविध स्तरांवर प्रयत्न झाले आहेत. तिलारीचे पाणी बेळगावला उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला जाणार आहे. हा प्रश्न भाषा किंवा सीमावादाशी न जोडता केवळ जनहिताच्या दृष्टीने मार्गी लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रस्तावाचे स्वागत करत संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासमवेत तिलारी जलाशय परिसराची संयुक्त पाहणी करून प्रकल्प पुढे नेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.</p>
<p style="text-align: justify;">या बैठकीला नेताजी जाधव, दीपक वाघेला, वंदना बेळगुंदकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, संजीव प्रभू, मोहम्मद पिरजादे यांच्यासह माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/">तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोपकडे वळवण्याची मागणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपमध्ये वळविण्याची मागणी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/tilariche-atirikt-pani-rakaskopmadhe-valvinyachi-magani/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/tilariche-atirikt-pani-rakaskopmadhe-valvinyachi-magani/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 14 Jul 2026 11:16:37 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[Chandgad]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[rakaskop dam]]></category>
		<category><![CDATA[water supply]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18199</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन चंदगड : बेळगाव शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याची<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/tilariche-atirikt-pani-rakaskopmadhe-valvinyachi-magani/">तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपमध्ये वळविण्याची मागणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांना निवेदन</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>चंदगड :</strong> बेळगाव शहरातील वाढत्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. यासंदर्भात बेळगाव महापालिकेच्या माजी नगरसेवक संघटनेच्या शिष्टमंडळाने चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.</p>
<p style="text-align: justify;">निवेदनात तिलारी धरणातील अतिरिक्त पाणी मार्कंडेय नदीमार्गे राकसकोप जलाशयात वळविण्याची योजना राबविण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रकल्प साकार झाल्यास बेळगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांच्या सिंचनाच्या गरजाही प्रभावीपणे पूर्ण होऊ शकतील, असा दावा शिष्टमंडळाने केला आहे.</p>
<p style="text-align: justify;">बेळगावच्या वाढत्या लोकसंख्येमुळे भविष्यातील पाणीपुरवठा लक्षात घेऊन या योजनेचा गांभीर्याने विचार करून आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/tilariche-atirikt-pani-rakaskopmadhe-valvinyachi-magani/">तिलारीचे अतिरिक्त पाणी राकसकोपमध्ये वळविण्याची मागणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/tilariche-atirikt-pani-rakaskopmadhe-valvinyachi-magani/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान</title>
		<link>https://news24tassmarathi.in/yellur-yethil-vaishnav-sadan-ashramachya-dindiche-pandharpurkade-prasthan/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/yellur-yethil-vaishnav-sadan-ashramachya-dindiche-pandharpurkade-prasthan/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 14 Jul 2026 08:46:08 +0000</pubDate>
				<category><![CDATA[ashadhi wari]]></category>
		<category><![CDATA[Ashadi Ekadashi]]></category>
		<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Pandharpur]]></category>
		<category><![CDATA[yellur]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18196</guid>

					<description><![CDATA[<p>१६ व्या वर्षी पायी वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शेकडो वारकरी सहभागी येळ्ळूर : आषाढी वारीनिमित्त येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या वतीने पंढरपूरकडे निघालेली पारंपरिक पायी दिंडी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/yellur-yethil-vaishnav-sadan-ashramachya-dindiche-pandharpurkade-prasthan/">येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>१६ व्या वर्षी पायी वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद ; शेकडो वारकरी सहभागी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>येळ्ळूर :</strong> आषाढी वारीनिमित्त येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या वतीने पंढरपूरकडे निघालेली पारंपरिक पायी दिंडी दुसऱ्या दिवशीही अभंग, टाळ-मृदुंगाच्या गजरात मार्गक्रमण करत पुढे सरकली. गेली १५ वर्षे अखंड सुरू असलेली ही दिंडी यंदा १६ व्या वर्षात प्रवेश करत असून, शेकडो वारकरी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले आहेत.</p>
<p style="text-align: justify;">मौनानंद तुकाराम महाराज मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धामणे येथील हभप मारुती महाराज सांबरेकर यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी निघाली आहे. वैष्णव सदन आश्रमात विधीवत पादुका पूजनानंतर भव्य मिरवणुकीने यात्रेला प्रारंभ झाला. ९० वर्षांवरील ज्येष्ठ वारकऱ्यांपासून ते लहान मुलांपर्यंत विविध वयोगटातील भाविकांनी पायी वारीत सहभाग नोंदविला.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांनी दिंडीची भेट घेऊन वारकऱ्यांशी संवाद साधला. राज्यातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी तसेच उत्तम पिकपाण्यासाठी विठ्ठल चरणी प्रार्थना करण्याची विनंती त्यांनी वारकऱ्यांना केली. दरवर्षी दिंडीत सहभागी होणे आणि वारकऱ्यांची सेवा करणे ही आपल्या कुटुंबाची परंपरा असल्याचे सांगत, पुढील वर्षी स्वतःही पायी वारीत सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">गतवर्षी दिंडीच्या वाहनांना महामार्गावरील टोल नाक्यांवर वाहतुकीच्या अडचणींचा सामना करावा लागला होता. ही बाब लक्षात घेऊन यंदा आमदार लक्ष्मी हेब्बाळकर आणि मृणाल हेब्बाळकर यांच्या सहकार्याने दिंडीच्या वाहनांसाठी टोल नाक्यांवर सुलभ आणि टोलमुक्त प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. या सहकार्याबद्दल दिंडी समितीने हेब्बाळकर कुटुंबाचे आभार व्यक्त केले.</p>
<p style="text-align: justify;">
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/yellur-yethil-vaishnav-sadan-ashramachya-dindiche-pandharpurkade-prasthan/">येळ्ळूर येथील वैष्णव सदन आश्रमाच्या दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/yellur-yethil-vaishnav-sadan-ashramachya-dindiche-pandharpurkade-prasthan/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सीमाप्रश्नी सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला सीमावासीय पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद</title>
		<link>https://news24tassmarathi.in/seemaprashni-sarvochcha-sahyanchya-mohimela-seemavasiya-punekaranchya-utsphurt-pratisad/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/seemaprashni-sarvochcha-sahyanchya-mohimela-seemavasiya-punekaranchya-utsphurt-pratisad/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 12 Jul 2026 04:41:20 +0000</pubDate>
				<category><![CDATA[border dispute]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Pune]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18136</guid>

					<description><![CDATA[<p>आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यात जनजागृती सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी पाठिंबा पुणे : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील लढ्याला बळ मिळावे, या उद्देशाने बेळगाव मराठी पत्रकार संघ आणि मध्यवर्ती<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/seemaprashni-sarvochcha-sahyanchya-mohimela-seemavasiya-punekaranchya-utsphurt-pratisad/">सीमाप्रश्नी सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला सीमावासीय पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यात जनजागृती</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>सर्वोच्च न्यायालयातील लढ्यासाठी पाठिंबा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>पुणे :</strong> महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील लढ्याला बळ मिळावे, या उद्देशाने बेळगाव मराठी पत्रकार संघ आणि मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पुढाकारातून सुरू असलेल्या सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला पुण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पुणे विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात सीमाप्रश्नाविषयी जनजागृती करत सह्यांची मोहीम राबविण्यात आली.</p>
<p style="text-align: justify;">आषाढी एकादशीनिमित्त सीमाभागातील हजारो वारकरी भाविक पुण्यात येतात. तसेच रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या सीमावासीयांचाही मोठा सहभाग या कार्यक्रमात होता. या निमित्ताने आयोजित सभेत सीमाप्रश्न, सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटला आणि सीमाभागातील मराठी भाषिकांवरील कथित भाषिक अन्याय या विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांकडून सह्या घेऊन मोहिमेला व्यापक पाठिंबा देण्यात आला.</p>
<p style="text-align: justify;">कार्यक्रमाच्या प्रारंभी विश्वनाथ पाखरे यांनी मोहिमेचा उद्देश स्पष्ट केला. चन्नेवाडी (ता. खानापूर) येथील रामचंद्र पाटील यांनी सीमाभागातील मराठी भाषिकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांचा आढावा घेत मराठी भाषेवरील कथित गळचेपी, कन्नड सक्ती आणि मराठी भाषिकांवर दाखल होणाऱ्या कथित खोट्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. पुण्यातील युवकांनी आपल्या जन्मभूमीच्या प्रश्नासाठी उचललेल्या पुढाकाराचे त्यांनी कौतुक केले.</p>
<p style="text-align: justify;">खानापूर-बेळगाव मित्र मंडळाचे संस्थापक पीटर डिसोझा यांनी मतभेद बाजूला ठेवून सीमावासीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारला वेळोवेळी जाग करण्याचे काम सातत्याने सुरू ठेवू, अशी ग्वाही त्यांनी दिली.</p>
<p style="text-align: justify;">मित्र मंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांनी सीमाप्रश्न हा दोन राज्यांमधील विषय असल्याचे सांगत, उच्चाधिकार समितीच्या अलीकडील बैठकीमुळे सीमालढ्याला नवे वळण मिळाल्याचे मत व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयातील लढा अधिक निकराने लढण्याची गरज असून समाजमाध्यमांवर सीमाप्रश्नाबाबत मते व्यक्त करताना कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची युवकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.</p>
<p style="text-align: justify;">उद्योजक मारुती वाणी यांनी सीमालढ्याला नवसंजीवनी देण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगितले. हा लढा कोणत्याही राज्याविरुद्ध किंवा भाषेविरुद्ध नसून सीमावासीयांच्या अस्मितेचा असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक सीमावासीयाने या आंदोलनात सहभागी होऊन आपले कर्तव्य पार पाडावे, असेही ते म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">दत्ता भेकणे, संदीप घाडी, केदार शिवणगेकर आणि शिवाजी जळगेकर यांनीही सीमालढ्यासाठी पुढाकार घेतलेल्या पुणेस्थित युवकांचे कौतुक करत मार्गदर्शन केले.</p>
<p style="text-align: justify;">कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सातेरी पाटील आणि गणपती पाटील यांनी केले. यावेळी लक्ष्मण काकतकर, रामचंद्र निलजकर, अरुण वीर, मारुती पाटील, अर्जुन वीर, गंगाराम वीर, प्रशांत गुंजीकर, विनोद वीर, सुधीर शिवणगेकर, शांताराम बडस्कर, सुरेश हलगी, भुजंग पाखरे, विजय सावंत, विठ्ठल सावंत, राजू सावंत, प्रमोद सावंत, शिवाजी पाटील, बाळकृष्ण गुंडप, शंकर गुरव, पुंडलिक पाटील, अतुल काकतकर, श्रीधर पाटील, नारायण पाटील, संतोष रूपन, सतीश रूपन, प्रल्हाद पाटील, सिद्धू वाकाले, कलाप्पा पाटील, विजय गुरव, ज्ञानेश्वर पाटील, श्रीकांत मिराशी, माऊली पठाण, नारायण पठाण, राजू शिंदे, रामचंद्र सबनीस, मानतेश मळक, महेश वाकले, महेश अंग्रोळकर, राजकुमार अंग्रोळकर, निवृत्ती मोरे, व्यंकप्पा पाटील यांच्यासह अनेक सीमावासी उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/seemaprashni-sarvochcha-sahyanchya-mohimela-seemavasiya-punekaranchya-utsphurt-pratisad/">सीमाप्रश्नी सर्वोच्च सह्यांच्या मोहिमेला सीमावासीय पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/seemaprashni-sarvochcha-sahyanchya-mohimela-seemavasiya-punekaranchya-utsphurt-pratisad/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>यशवंतपूर &#8211; बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा</title>
		<link>https://news24tassmarathi.in/yashvantpur-bikaner-expressvar-daroda/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/yashvantpur-bikaner-expressvar-daroda/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 12 Jul 2026 04:20:16 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Crime]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[railway]]></category>
		<category><![CDATA[robbery]]></category>
		<category><![CDATA[Solapur]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18133</guid>

					<description><![CDATA[<p>दरोडेखोरांकडून प्रवाशांना मारहाण करत लूट महिलांचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास सोलापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर- बिकानेर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी पहाटे पाच<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/yashvantpur-bikaner-expressvar-daroda/">यशवंतपूर &#8211; बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>दरोडेखोरांकडून प्रवाशांना मारहाण करत लूट</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>महिलांचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल लंपास</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>सोलापूर :</strong> महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील तडवळ रेल्वे स्थानकावर थांबलेल्या यशवंतपूर- बिकानेर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी पहाटे पाच ते सहा अज्ञात दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकत महिलांसह प्रवाशांना मारहाण केली. प्रवाशांकडील रोख रक्कम, मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने लुटून आरोपी पसार झाले. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.</p>
<p style="text-align: justify;">गाडी क्रमांक १६५८७ यशवंतपूर–बिकानेर एक्स्प्रेस पहाटे २.४९ ते ४.०३ या कालावधीत तब्बल ७४ मिनिटे तडवळ रेल्वे स्थानकावर उभी होती. याच संधीचा फायदा घेत पाच ते सहा जणांच्या टोळीने एस-४, एस-६ आणि एस-७ या डब्यांमध्ये प्रवेश केला. काही दरोडेखोरांनी खिडक्यांमधून हात घालून प्रवाशांचे साहित्य हिसकावले, तर काहींनी थेट डब्यात घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.</p>
<p style="text-align: justify;">दरोडेखोरांना विरोध करणाऱ्या काही प्रवाशांना मारहाण करण्यात आली. तसेच दगडफेक करून त्यांना जखमी केल्याची माहितीही समोर आली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे डब्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि प्रवाशांनी आरडाओरडा करून मदतीची याचना केली.</p>
<p style="text-align: justify;">रेल्वेच्या मदत क्रमांकावर माहिती मिळाल्यानंतर गाडी पहाटे ४.५८ वाजता सोलापूर स्थानकात पोहोचताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) घटनास्थळी दाखल झाले. महेश गोपाळ पवार यांच्या फिर्यादीवरून सोलापूर लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.</p>
<p style="text-align: justify;">पोलीस उपनिरीक्षक तांबोळी यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळाची पाहणी केली असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रवाशांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/yashvantpur-bikaner-expressvar-daroda/">यशवंतपूर &#8211; बिकानेर एक्स्प्रेसवर दरोडा</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/yashvantpur-bikaner-expressvar-daroda/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>मुंबई &#8211; बंगळुरू मार्गावर धावणार देशातील दुसरी &#8216;वंदे भारत स्लीपर&#8217;</title>
		<link>https://news24tassmarathi.in/mumbai-bengaluru-margawar-dhavnar-deshatil-dusari-vande-bharat-sleeper/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/mumbai-bengaluru-margawar-dhavnar-deshatil-dusari-vande-bharat-sleeper/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 10 Jul 2026 16:10:24 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Bengaluru]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[railway]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18112</guid>

					<description><![CDATA[<p>अंतिम चाचणी टप्प्यात   बेळगाव, पुणे, हुबळी &#8211; धारवाडच्या प्रवाशांनाही लाभ ताशी १८० किमी वेगाची क्षमता मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते केएसआर बंगळुरू<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/mumbai-bengaluru-margawar-dhavnar-deshatil-dusari-vande-bharat-sleeper/">मुंबई &#8211; बंगळुरू मार्गावर धावणार देशातील दुसरी &#8216;वंदे भारत स्लीपर&#8217;</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>अंतिम चाचणी टप्प्यात  </strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>बेळगाव, पुणे, हुबळी &#8211; धारवाडच्या प्रवाशांनाही लाभ </strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>ताशी १८० किमी वेगाची क्षमता</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते केएसआर बंगळुरू रेल्वे स्थानकादरम्यान धावणारी देशातील दुसरी &#8216;वंदे भारत स्लीपर&#8217; रेल्वे अंतिम चाचणी टप्प्यात पोहोचली आहे. सर्व सुरक्षा चाचण्या आणि आवश्यक मंजुरी पूर्ण झाल्यानंतर ही अत्याधुनिक रेल्वे प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असून, मुंबई–बंगळुरू प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी होण्याची अपेक्षा आहे.</p>
<p style="text-align: justify;">भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड (बीईएमएल)ने चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरी (आयसीएफ)च्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही स्लीपर रेल्वे विकसित केली आहे. ग्रे आणि ऑरेंज रंगसंगतीतील ही रेल्वे विशेषतः रात्रीच्या लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी डिझाइन करण्यात आली असून, ताशी १८० किलोमीटर वेगाने धावण्याची क्षमता तिच्यामध्ये आहे.</p>
<p style="text-align: justify;">या स्लीपर ट्रेनमध्ये एकूण १६ डबे असून ८२३ प्रवाशांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ११ एसी ३-टियर डबे (६११ बर्थ), ४ एसी २-टियर डबे (१८८ बर्थ) आणि एक फर्स्ट एसी डबा समाविष्ट आहे.</p>
<p style="text-align: justify;">प्रवाशांच्या सुरक्षितता आणि आरामासाठी या रेल्वेमध्ये कमी कंपन व आवाज, आधुनिक शौचालये, डिजिटल प्रवासी माहिती प्रणाली, सीसीटीव्ही, पूर्ण वातानुकूलित व्यवस्था, &#8216;कवच&#8217; सुरक्षा प्रणाली तसेच आपत्कालीन &#8216;टॉक-बॅक&#8217; सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.</p>
<p style="text-align: justify;">या मार्गावर बेळगाव, हुबळी-धारवाड आणि पुणे येथील प्रवाशांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे मुंबई आणि बंगळुरूदरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुखकर होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.</p>
<p style="text-align: justify;">देशातील पहिली वंदे भारत स्लीपर रेल्वे जानेवारी २०२६ मध्ये हावडा–कामाख्या मार्गावर सुरू करण्यात आली होती. त्यानंतर आता मुंबई–बंगळुरू मार्गावरील ही दुसरी स्लीपर रेल्वे सेवेत दाखल होण्याच्या अंतिम टप्प्यात असून, चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर भारतीय रेल्वेकडून तिच्या उद्घाटनाची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/mumbai-bengaluru-margawar-dhavnar-deshatil-dusari-vande-bharat-sleeper/">मुंबई &#8211; बंगळुरू मार्गावर धावणार देशातील दुसरी &#8216;वंदे भारत स्लीपर&#8217;</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/mumbai-bengaluru-margawar-dhavnar-deshatil-dusari-vande-bharat-sleeper/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम</title>
		<link>https://news24tassmarathi.in/seemaprashni-mahajan-ahwalach-antim/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/seemaprashni-mahajan-ahwalach-antim/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 09 Jul 2026 16:14:58 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[border dispute]]></category>
		<category><![CDATA[chief minister]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[pressmeet]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18070</guid>

					<description><![CDATA[<p>मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची स्पष्ट भूमिका बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर महाजन आयोगाचा अहवालच अंतिम असल्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केली. सीमावर्ती<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/seemaprashni-mahajan-ahwalach-antim/">सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची स्पष्ट भूमिका</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर महाजन आयोगाचा अहवालच अंतिम असल्याची ठाम भूमिका मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केली. सीमावर्ती भागातील कर्नाटकच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे त्यांनी बेळगावातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.</p>
<p style="text-align: justify;">सर्वोच्च न्यायालयात सीमावादाचा खटला प्रलंबित असतानाच मुख्यमंत्र्यांनी ही भूमिका जाहीर केल्याने सीमाभागातील मराठी भाषिकांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. तसेच बेळगाव महापालिकेत या विषयासंदर्भातील ठराव मंजूर करण्यासाठी लवकरच बैठक बोलावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितल्याने या प्रश्नावर नव्याने राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. सीमाभागातील लोकप्रतिनिधींनीही या भूमिकेवर आक्षेप नोंदविला आहे.</p>
<p style="text-align: justify;">महादायी योजनेबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, केंद्र सरकारकडून अद्याप अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नसला तरी गोवा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांशी समन्वय साधून ही योजना पुढे नेण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्नशील राहील.</p>
<p style="text-align: justify;">राममंदिरातील देणगी चोरीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मुजराई मंदिरांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य करण्यात येणार असून, देणगी मोजणीच्या वेळी पोलिसांशी समन्वय ठेवण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.</p>
<p style="text-align: justify;">राज्य सरकारच्या गॅरंटी योजना सुरूच राहतील, असे स्पष्ट करताना गृहलक्ष्मी आणि गृहज्योती योजनेंतर्गत मृत व्यक्तींच्या खात्यावर निधी जमा होऊ नये, यासाठी लाभार्थ्यांची पडताळणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर मदत केंद्र सुरू करून नागरिकांना मोफत रहिवासी दाखले उपलब्ध करून देण्याची योजनाही सरकार राबविणार असल्याचे त्यांनी नमूद केले.</p>
<p style="text-align: justify;">बेंगळुरूमध्ये शेतकऱ्यांच्या पीक विमा फसवणुकीला आळा घालण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात येणार असून, कृत्रिम ढगफुटीबाबत तज्ज्ञांच्या अहवालानुसार पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">देशात प्रथमच छायाचित्रासह &#8216;भूमी गॅरंटी&#8217; ई-खाते योजना लागू करण्यात येणार असल्याची घोषणा करताना, आलमट्टी धरणग्रस्त शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने योग्य मोबदला देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, एम. बी. पाटील, यू. टी. खादर, ईश्वर खंड्रे यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधी उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/seemaprashni-mahajan-ahwalach-antim/">सीमाप्रश्नी महाजन अहवालच अंतिम</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/seemaprashni-mahajan-ahwalach-antim/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
