<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>water crisis Archives | News 24 Tass Marathi</title>
	<atom:link href="https://news24tassmarathi.in/category/water-crisis/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://news24tassmarathi.in/category/water-crisis/</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Tue, 28 Jul 2026 16:21:22 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0.4</generator>

<image>
	<url>https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/07/android-chrome-192x192-nobg-75x75.png</url>
	<title>water crisis Archives | News 24 Tass Marathi</title>
	<link>https://news24tassmarathi.in/category/water-crisis/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>राकसकोप धरण भरण्याच्या उंबरठ्यावर</title>
		<link>https://news24tassmarathi.in/rakasakop-dharan-bharanyachya-umbarthyavar/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/rakasakop-dharan-bharanyachya-umbarthyavar/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 28 Jul 2026 16:21:21 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[groundwater level]]></category>
		<category><![CDATA[rakaskop dam]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18558</guid>

					<description><![CDATA[<p>सततच्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ शहराच्या पाणीपुरवठ्याला मिळणार आधार बेळगाव : गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बेळगाव शहरासाठी आता दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/rakasakop-dharan-bharanyachya-umbarthyavar/">राकसकोप धरण भरण्याच्या उंबरठ्यावर</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>सततच्या पावसामुळे पाणीसाठ्यात वाढ</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>शहराच्या पाणीपुरवठ्याला मिळणार आधार</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> गेल्या काही महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या बेळगाव शहरासाठी आता दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून धरण पूर्ण क्षमतेच्या जवळ पोहोचले आहे.</p>
<p style="text-align: justify;">यंदा पावसाला झालेल्या विलंबामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस राकसकोप धरणातील पाणीसाठा मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. मे महिन्यात धरणातील पाणीपातळी चिंताजनक स्थितीवर पोहोचल्याने बेळगाव शहरावर पाणी संकट ओढवले होते. त्यावेळी उपलब्ध पाणीसाठा केवळ १० ते १५ दिवस पुरेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.</p>
<p style="text-align: justify;">बेळगाव शहराला दररोज सुमारे १३० ते १३५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलस्रोतांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते.</p>
<p style="text-align: justify;">सध्या झालेल्या पावसामुळे मार्कंडेय नदी आणि जांबूळा कालव्यातून राकसकोप धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. २७ जुलै रोजी धरणाची पाणीपातळी २४७०.३ फूट नोंदवण्यात आली असून धरणाची पूर्ण क्षमतेची पातळी २४७७ फूट आहे. त्यामुळे धरण पूर्ण भरण्यासाठी अजून काही फूट पाण्याची आवश्यकता आहे.</p>
<p style="text-align: justify;">राकसकोप धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळणार आहे. उपलब्ध साठ्यामुळे पावसाळ्यानंतरच्या काळात शहराला काही महिन्यांसाठी पुरेसा पाणीपुरवठा करता येण्याची शक्यता आहे. मात्र, उन्हाळ्यातील बाष्पीभवन, पाण्याचा वापर आणि हिडकल धरणातून होणारा पुरवठा यावर पाणीसाठ्याचा कालावधी अवलंबून राहणार आहे.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, पावसाचा जोर कायम राहिल्यास राकसकोप धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, धरणाचे दरवाजे उघडण्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.</p>
<p style="text-align: justify;">काही आठवड्यांपूर्वी पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बेळगाव शहरवासीयांसाठी आता राकसकोप धरणातील वाढता पाणीसाठा मोठा दिलासा ठरत आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रतीक्षा शहरवासीयांना लागली आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/rakasakop-dharan-bharanyachya-umbarthyavar/">राकसकोप धरण भरण्याच्या उंबरठ्यावर</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/rakasakop-dharan-bharanyachya-umbarthyavar/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा २०.१ टक्के कमी पाऊस</title>
		<link>https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyat-sarasaripeksha-20-1-takke-kami-paus/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyat-sarasaripeksha-20-1-takke-kami-paus/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 25 Jul 2026 05:44:35 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[deputy commissioner]]></category>
		<category><![CDATA[pressmeet]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18457</guid>

					<description><![CDATA[<p>सात तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट पाणी जपून वापरण्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आवाहन बेळगाव : यंदाच्या मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्यामुळे बेळगाव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyat-sarasaripeksha-20-1-takke-kami-paus/">बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा २०.१ टक्के कमी पाऊस</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>सात तालुक्यांत पाणीटंचाईचे संकट </strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>पाणी जपून वापरण्याचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांचे आवाहन</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> यंदाच्या मान्सूनने अपेक्षित साथ न दिल्यामुळे बेळगाव जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा २०.१ टक्के कमी पावसाची नोंद झाली असून, सात तालुक्यांमध्ये पावसाअभावी पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जलाशयांमध्ये पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा करण्यास प्राधान्य दिले जात असून, नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.</p>
<p style="text-align: justify;">जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मोहम्मद रोशन यांनी जिल्ह्यातील जलसाठ्याची सद्यस्थिती स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, कृष्णा नदीत सध्या ८० ते ९० हजार क्युसेक पाण्याची आवक होत असून हिप्परगी जलाशयात त्याचा साठा केला जात आहे. आवश्यकतेनुसार जलाशयांमध्ये पाणी साठवून त्यानंतरच पुढे विसर्ग केला जात आहे.</p>
<p style="text-align: justify;">हिडकल जलाशयात सध्या २५ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध असून, तेथे १३ हजार क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. पिण्याच्या पाण्याच्या गरजा लक्षात घेऊन सुमारे १ टीएमसी पाणी सोडण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, अपुऱ्या पावसामुळे मलप्रभा खोऱ्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. मलप्रभा जलाशयात सध्या १४ टीएमसी पाणीसाठा असून तो गरजेच्या तुलनेत अपुरा आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास आवक वाढेल आणि त्यानुसार जलाशयात अधिक पाणीसाठा करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">शेतकऱ्यांनी पावसाच्या अपेक्षेवर पेरणी केली असली तरी पावसाने दडी मारल्यामुळे पिकांवर संकट ओढवले आहे. त्यामुळे पिके वाचविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन प्रशासनाने सुरू केले आहे. सलग दोन ते तीन दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती मोठ्या प्रमाणात सुधारू शकते, असा विश्वासही जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी व्यक्त केला.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyat-sarasaripeksha-20-1-takke-kami-paus/">बेळगाव जिल्ह्यात सरासरीपेक्षा २०.१ टक्के कमी पाऊस</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyat-sarasaripeksha-20-1-takke-kami-paus/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोपकडे वळवण्याची मागणी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 17 Jul 2026 13:49:50 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[Chandgad]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Kolhapur]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[memorandum]]></category>
		<category><![CDATA[rakaskop dam]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18265</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन बेळगाव : शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी जलाशयातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याच्या<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/">तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोपकडे वळवण्याची मागणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>बेळगाव माजी नगरसेवक संघटनेचे खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> शहरातील वारंवार उद्भवणाऱ्या पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्रातील तिलारी जलाशयातील अतिरिक्त पाणी राकसकोप जलाशयात वळविण्याच्या प्रस्तावाला नव्याने गती मिळाली आहे. या मागणीसंदर्भात बेळगावच्या माजी नगरसेवकांच्या संघटनेने खासदार जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या प्रस्तावाबाबत खासदार शेट्टर यांनी सकारात्मक भूमिका घेत पुढील पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.</p>
<p style="text-align: justify;">सर्किट हाऊसमध्ये झालेल्या बैठकीत शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती आणि भविष्यातील उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. दरवर्षी मे ते जुलै या कालावधीत राकसकोप आणि हिडकल जलाशयांतील पाणीसाठा कमी झाल्याने बेळगाव शहराला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यावर दीर्घकालीन उपाय म्हणून चंदगड तालुक्यातील तिलारी जलाशय आणि राकसकोप जलाशय यांची &#8216;राष्ट्रीय नदी जोड प्रकल्पा&#8217;अंतर्गत जोडणी करण्याची मागणी माजी नगरसेवकांनी केली.</p>
<p style="text-align: justify;">माजी नगरसेवक संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव सुंठकर यांनी सांगितले की, तिलारी जलाशयात वीज निर्मितीनंतर मे ते जुलै या काळात मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त पाणी उपलब्ध असते. हे पाणी राकसकोप जलाशयात वळविल्यास बेळगाव शहरासह परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो. याशिवाय मार्कंडेय नदीच्या पात्रातून शेतीसाठीही या पाण्याचा लाभ होईल.</p>
<p style="text-align: justify;">माजी नगरसेवक लतीफ खान पठाण यांनी सांगितले की, या योजनेसाठी यापूर्वीही विविध स्तरांवर प्रयत्न झाले आहेत. तिलारीचे पाणी बेळगावला उपलब्ध व्हावे यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय संसदेच्या पावसाळी अधिवेशनातही उपस्थित केला जाणार आहे. हा प्रश्न भाषा किंवा सीमावादाशी न जोडता केवळ जनहिताच्या दृष्टीने मार्गी लावावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रस्तावाचे स्वागत करत संसदेचे पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा करणार असल्याचे सांगितले. तसेच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्यासमवेत तिलारी जलाशय परिसराची संयुक्त पाहणी करून प्रकल्प पुढे नेण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन त्यांनी दिले.</p>
<p style="text-align: justify;">या बैठकीला नेताजी जाधव, दीपक वाघेला, वंदना बेळगुंदकर, रेणू किल्लेकर, सुधा भातकांडे, संजीव प्रभू, मोहम्मद पिरजादे यांच्यासह माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/">तिलारी जलाशयाचे अतिरिक्त पाणी राकसकोपकडे वळवण्याची मागणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/tilari-jalashayache-atirikt-pani-rakaskopkade-valvnyachi-magani/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>चव्हाट गल्लीत आठ दिवसांपासून पाणीटंचाई ; नागरिकांचा संताप अनावर</title>
		<link>https://news24tassmarathi.in/chavhat-gallit-aath-divasanpasun-panitanchai-nagarikanchya-santap-anavar/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/chavhat-gallit-aath-divasanpasun-panitanchai-nagarikanchya-santap-anavar/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 15 Jul 2026 16:35:17 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[chavat galli]]></category>
		<category><![CDATA[civic problem]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=18235</guid>

					<description><![CDATA[<p>समस्या तातडीने न सुटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा पाईपलाईन दुरुस्तीत दिरंगाई; प्रशासन आणि कंत्राटदारांवर हलगर्जीपणाचा आरोप बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेल्या<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/chavhat-gallit-aath-divasanpasun-panitanchai-nagarikanchya-santap-anavar/">चव्हाट गल्लीत आठ दिवसांपासून पाणीटंचाई ; नागरिकांचा संताप अनावर</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>समस्या तातडीने न सुटल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलनाचा इशारा</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>पाईपलाईन दुरुस्तीत दिरंगाई; प्रशासन आणि कंत्राटदारांवर हलगर्जीपणाचा आरोप</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> शहरातील चव्हाट गल्ली परिसरात पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन गेल्या आठ दिवसांपासून नादुरुस्त असल्याने नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. प्रशासन आणि संबंधित कंत्राटदारांकडून होत असलेल्या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या रहिवाशांनी तातडीने नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.</p>
<p style="text-align: justify;">स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, राकसकोप जलाशयात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही परिसरात नियमित पाणीपुरवठा होत नाही. महापालिकेकडून टँकरद्वारे पाणी पुरवले जात असले तरी वृद्ध, महिला आणि नोकरीसाठी बाहेर जाणाऱ्या कुटुंबीयांसाठी ही व्यवस्था अपुरी आणि गैरसोयीची ठरत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.</p>
<p style="text-align: justify;">स्थानिक महिलांनी प्रशासनाने केवळ आश्वासने न देता तातडीने पाईपलाईनची दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा येत्या काही दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, स्थानिक नागरिकांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप केला आहे. महापालिकेचा कंत्राटदारांवर प्रभावी नियंत्रण नसल्यामुळे काम रखडले असून, खासगी कंपनी आणि केयूडब्ल्यूएस संस्थेकडून एकमेकांवर जबाबदारी ढकलली जात असल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.</p>
<p style="text-align: justify;">पाणीपुरवठा मंडळाने दोन दिवसांपूर्वीच पाईपलाईन दुरुस्तीचे आदेश दिल्याचे सांगितले जात असले, तरी संबंधित कंत्राटदारांनी अद्याप काम सुरू केले नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.</p>
<p style="text-align: justify;">कंत्राटदारांची जबाबदारी निश्चित करणारी प्रभावी अट करारामध्ये नसल्याने त्यांच्यावर कोणताही अंकुश राहिलेला नाही. यामुळे नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष होत असून संबंधित यंत्रणांमध्ये समन्वयाचा अभाव स्पष्टपणे दिसून येत आहे, अशी नाराजी स्थानिकांनी व्यक्त केली.</p>
<p style="text-align: justify;">उद्यापर्यंत पाईपलाईनची दुरुस्ती करून नियमित पाणीपुरवठा सुरू न झाल्यास पुढील दोन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/chavhat-gallit-aath-divasanpasun-panitanchai-nagarikanchya-santap-anavar/">चव्हाट गल्लीत आठ दिवसांपासून पाणीटंचाई ; नागरिकांचा संताप अनावर</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/chavhat-gallit-aath-divasanpasun-panitanchai-nagarikanchya-santap-anavar/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बेळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दूर</title>
		<link>https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyatil-panitanchayiche-sankat-dur/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyatil-panitanchayiche-sankat-dur/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 04 Jul 2026 09:45:00 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[pressmeet]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17905</guid>

					<description><![CDATA[<p>क्लाउड सीडिंगची गरज नाही : मंत्री सतीश जारकीहोळी बेळगाव : जिल्ह्यात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली असून, सध्या हावेरी मॉडेलनुसार<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyatil-panitanchayiche-sankat-dur/">बेळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दूर</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>क्लाउड सीडिंगची गरज नाही : मंत्री सतीश जारकीहोळी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> जिल्ह्यात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे बेळगाव जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली असून, सध्या हावेरी मॉडेलनुसार क्लाउड सीडिंग करण्याची गरज नसल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील प्रमुख जलस्रोत असलेल्या राकसकोप जलाशयात पाच नद्यांमधून पाण्याची आवक सुरू झाली आहे. यंदा पावसात सुमारे २९ टक्के तूट असली तरी पुढील तीन ते चार दिवस पाऊस सुरू राहिल्यास ही तूट भरून निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>
<p style="text-align: justify;">मंत्री जारकीहोळी म्हणाले की, जिल्ह्यातील पेरणीचे काम समाधानकारक झाले आहे. भविष्यात पावसाअभावी पिकांचे नुकसान झाल्यास सरकारकडून स्वतंत्र सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत दिली जाईल. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.</p>
<p style="text-align: justify;">कित्तूर आणि बैलहोंगल परिसरातील पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी खुले करण्यात येतील. पावसाळा संपल्यानंतर डिसेंबरमध्ये कायमस्वरूपी रस्ते बांधण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. शहरातील एल अँड टी कंपनीच्या रखडलेल्या कामांबाबतही अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असून, ती लवकर पूर्ण करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p style="text-align: justify;">शहरातील पदपथ आणि रस्त्यावरील विक्रेत्यांवरील कारवाईबाबत त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार ही मोहीम राबवली जात आहे. मात्र, गरीब विक्रेत्यांना आपला माल सुरक्षितपणे हलविण्यासाठी पुरेसा वेळ देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात येतील. तसेच नियमांनुसार त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यावरही भर दिला जाईल, असे त्यांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">यमकनमर्डी येथील स्वामीजींवरील हल्ल्याच्या प्रकरणावर बोलताना मंत्री जारकीहोळी म्हणाले की, या प्रकरणाचा निर्णय संबंधित समिती आणि स्वामीजी स्वतः घेतील. या घटनेचे राजकारण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत त्यांनी निवडणुका जवळ आल्याने अशा प्रकारचे आरोप-प्रत्यारोप होत राहतील, अशी प्रतिक्रिया दिली.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyatil-panitanchayiche-sankat-dur/">बेळगाव जिल्ह्यातील पाणीटंचाईचे संकट दूर</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/belgaav-jilhyatil-panitanchayiche-sankat-dur/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>बेळगावच्या पाणीपुरवठ्याबाबत जनतेने चिंता करू नये ; मंत्री सतीश जारकीहोळी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/belgaavchya-panipuravathyababat-janatene-chinta-karu-naye-mantri-mantri-satish-jarkiholi/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/belgaavchya-panipuravathyababat-janatene-chinta-karu-naye-mantri-mantri-satish-jarkiholi/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 04 Jul 2026 09:07:20 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[dc office]]></category>
		<category><![CDATA[meeting]]></category>
		<category><![CDATA[natural disaster management]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<category><![CDATA[water supply]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17902</guid>

					<description><![CDATA[<p>जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक बेळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रगती आढावा बैठक पार पडली. यावेळी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/belgaavchya-panipuravathyababat-janatene-chinta-karu-naye-mantri-mantri-satish-jarkiholi/">बेळगावच्या पाणीपुरवठ्याबाबत जनतेने चिंता करू नये ; मंत्री सतीश जारकीहोळी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन प्रगती आढावा बैठक पार पडली. यावेळी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला.</p>
<p style="text-align: justify;">बैठकीनंतर बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी, पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेबाबत जनतेने चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. पुढील पाच ते सात दिवस समाधानकारक पाऊस झाल्यास पुढील चार ते पाच महिन्यांसाठी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.</p>
<p style="text-align: justify;">जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले की, सध्या राकसकोप जलाशयात ०.०४ टीएमसी पाणीसाठा असून पाणीपातळी हळूहळू वाढत आहे. आणखी तीन दिवस पाऊस सुरू राहिल्यास जलाशयाची पातळी १ ते १.५ फूट वाढण्याची शक्यता आहे. शहरातील सर्व प्रभागांना नियोजनानुसार पाणीपुरवठा केला जात असून, एकूण ३३ झोनपैकी ६ झोन पूर्णपणे कार्यरत आहेत, तर २७ झोनमध्ये आळीपाळीने दर आठ दिवसांनी पाणीपुरवठा केला जात आहे.</p>
<p style="text-align: justify;">महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी मार्कंडेय नदीवरील जलाशयात ०.००७८ टीएमसी पाणीसाठा झाल्याची माहिती दिली. पाऊस न पडला तरी २५ जुलैपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत राहू शकते, असे त्यांनी सांगितले.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी आमदार आसिफ सेठ यांनी पाणीपुरवठा खंडित करण्यापूर्वी नागरिकांना आणि लोकप्रतिनिधींना वेळेत माहिती देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यापूर्वी केवळ तीन दिवसांच्या बंदमुळे नागरिकांना तब्बल १५ दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागल्याचा उल्लेख करत त्यांनी भविष्यात अशा प्रकारची निष्काळजीपणा टाळण्याचे निर्देश दिले.</p>
<p style="text-align: justify;">बैठकीत जिल्ह्यातील पीक आणि मालमत्तेच्या नुकसानीचाही आढावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे, महापालिका आयुक्त कार्तिक एम. तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/belgaavchya-panipuravathyababat-janatene-chinta-karu-naye-mantri-mantri-satish-jarkiholi/">बेळगावच्या पाणीपुरवठ्याबाबत जनतेने चिंता करू नये ; मंत्री सतीश जारकीहोळी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/belgaavchya-panipuravathyababat-janatene-chinta-karu-naye-mantri-mantri-satish-jarkiholi/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ</title>
		<link>https://news24tassmarathi.in/rakaskop-jalashayachya-panipatlit-ek-footane-vadh/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/rakaskop-jalashayachya-panipatlit-ek-footane-vadh/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 03 Jul 2026 04:30:36 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[rakaskop dam]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<category><![CDATA[water supply]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17851</guid>

					<description><![CDATA[<p>तरीही डेड स्टॉकमधूनच पाणीउपसा गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४ फूट कमी पाणीसाठा शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता कायम बेळगाव : गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/rakaskop-jalashayachya-panipatlit-ek-footane-vadh/">राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>तरीही डेड स्टॉकमधूनच पाणीउपसा</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४ फूट कमी पाणीसाठा</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत चिंता कायम</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> गेल्या दोन दिवसांतील पावसामुळे बेळगाव शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एका फुटाची वाढ झाली असली, तरी जलाशय अद्यापही डेड स्टॉकच्या पातळीखाली असल्याने शहरासाठी डेड स्टॉकमधूनच पाणीउपसा सुरू आहे.</p>
<p style="text-align: justify;">गतवर्षी जुलैच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे राकसकोप जलाशय वेगाने भरू लागला होता. मात्र यंदा मान्सून उशिराने सक्रिय झाल्याने जलाशयातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत आहे. गतवर्षी याच दिवशी जलाशयाची पाणीपातळी २,४७१.७० फूट होती, तर यंदा ती केवळ २,४४७ फूट इतकी नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत तब्बल २४ फूट कमी पाणीसाठा जलाशयात आहे.</p>
<p style="text-align: justify;">गेल्या दोन दिवसांच्या पावसामुळे पाणीपातळीत काहीशी वाढ झाली असली, तरी ती अद्याप डेड स्टॉकच्या वर पोहोचलेली नाही. त्यामुळे शहराचा नियमित पाणीपुरवठा सध्या डेड स्टॉकमधील पाण्यावरच अवलंबून आहे.</p>
<p style="text-align: justify;">हवामान खात्याने येत्या काही दिवसांत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून, राकसकोप जलाशयाच्या पाणीसाठ्यात लवकरच लक्षणीय वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र तोपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/rakaskop-jalashayachya-panipatlit-ek-footane-vadh/">राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत एक फुटाने वाढ</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/rakaskop-jalashayachya-panipatlit-ek-footane-vadh/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पाणीपातळीत सातत्याने घट ; राकसकोप जलाशयाची अधिकाऱ्यांकडून पाहणी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/panipatlit-satatyane-ghat-rakaskop-jalashayachi-adhikaryankadun-pahani/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/panipatlit-satatyane-ghat-rakaskop-jalashayachi-adhikaryankadun-pahani/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Fri, 26 Jun 2026 05:39:53 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[groundwater level]]></category>
		<category><![CDATA[rakaskop dam]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17620</guid>

					<description><![CDATA[<p>पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा कपातीची शक्यता बेळगाव : शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, कर्नाटक नागरी पाणीपुरवठा व मलनिस्सारण मंडळ (KUWSDB) आणि एलॲण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/panipatlit-satatyane-ghat-rakaskop-jalashayachi-adhikaryankadun-pahani/">पाणीपातळीत सातत्याने घट ; राकसकोप जलाशयाची अधिकाऱ्यांकडून पाहणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नियोजन</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा कपातीची शक्यता</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिका, कर्नाटक नागरी पाणीपुरवठा व मलनिस्सारण मंडळ (KUWSDB) आणि एलॲण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी राकसकोप जलाशयाची पाहणी करून उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेतला. जलाशयातील पाणीपातळी सातत्याने घटत असल्याने आगामी काळात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.</p>
<p style="text-align: justify;">यंदा मान्सूनला झालेल्या विलंबामुळे राकसकोप आणि हिडकल या दोन्ही जलाशयांतील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. सध्या राकसकोप जलाशयातून मृतसाठ्यातील पाणी उपसून शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. वेळेत पाऊस न झाल्यास शहरासमोर गंभीर पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.</p>
<p style="text-align: justify;">महापालिका आयुक्त कार्तिक एम., अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर आणि एलॲण्डटीचे व्यवस्थापक धीरज उभयकर यांनी जलाशयाची प्रत्यक्ष पाहणी केली. गुरुवारी राकसकोप जलाशयाची पाणीपातळी २,४४६ फूट इतकी नोंदविण्यात आली असून मृतसाठ्यातील पाणी आणखी दोन फूटांनी कमी झाले आहे. सध्या मोटारींच्या साहाय्याने दररोज २० ते २५ एमएलडी पाणी उपसले जात असून, आवश्यकतेनुसार आणखी दोन मोटारी कार्यान्वित करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी जलवाहिन्यांचीही व्यवस्था करण्यात आली आहे.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, हिडकल जलाशयातील पाणीपातळी पाच टीएमसीपर्यंत खाली आली असून शेती आणि औद्योगिक वापरासाठीचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे. या जलाशयातून शहरासाठी दररोज ५५ एमएलडी पाणीपुरवठा सुरू आहे. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पुरवठा कायम ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.</p>
<p style="text-align: justify;">जलाशयांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने आणि पावसाचा पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यास, शहरातील पाणीपुरवठ्यात पुन्हा कपात करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/panipatlit-satatyane-ghat-rakaskop-jalashayachi-adhikaryankadun-pahani/">पाणीपातळीत सातत्याने घट ; राकसकोप जलाशयाची अधिकाऱ्यांकडून पाहणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/panipatlit-satatyane-ghat-rakaskop-jalashayachi-adhikaryankadun-pahani/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>कृष्णा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिक्कोडी तालुक्यात चिंता वाढली</title>
		<link>https://news24tassmarathi.in/krishna-naditil-panisatha-ghatlyane-chikkodi-talukyat-chinta-vadhli/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/krishna-naditil-panisatha-ghatlyane-chikkodi-talukyat-chinta-vadhli/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 24 Jun 2026 06:27:58 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Chikkodi]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17558</guid>

					<description><![CDATA[<p>नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईची भीती; पाणी सोडण्याची मागणी चिक्कोडी : बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटल्याने नदीकाठच्या भागात चिंतेचे वातावरण<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/krishna-naditil-panisatha-ghatlyane-chikkodi-talukyat-chinta-vadhli/">कृष्णा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिक्कोडी तालुक्यात चिंता वाढली</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>नदीकाठच्या गावांमध्ये पाणीटंचाईची भीती; पाणी सोडण्याची मागणी</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>चिक्कोडी :</strong> बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांसाठी महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या कृष्णा नदीतील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटल्याने नदीकाठच्या भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः चिक्कोडी तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.</p>
<p style="text-align: justify;">कृष्णा नदीवरील पाणीसाठा कमी झाल्यामुळे येडूर, कल्लोळ, मांजरी, चांदूर, अंकली, बावन सौंदत्ती आणि दिग्गेवाडी यांसारख्या गावांतील नागरिकांमध्ये भविष्यातील पाणीपुरवठ्याबाबत चिंता वाढली आहे. या भागांतील अनेक गावे पिण्याच्या पाण्यासाठी तसेच शेतीसाठी नदीवर अवलंबून आहेत.</p>
<p style="text-align: justify;">पाण्याअभावी नदीकाठच्या परिसरातील शेतीवरही परिणाम होऊ लागल्याचे शेतकरी सांगत आहेत. काही भागांतील पिकांना आवश्यक तेवढे पाणी मिळत नसल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होत असल्याने ग्रामीण भागातील अडचणी वाढत आहेत.</p>
<p style="text-align: justify;">स्थानिकांच्या मते, परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही तर तालुक्यातील आणखी काही गावांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संबंधित विभागांनी उपलब्ध जलस्रोतांचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत.</p>
<p style="text-align: justify;">दरम्यान, पाणीपुरवठ्याची स्थिती आणि जलसाठ्याचा नियमित आढावा घेऊन नागरिकांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/krishna-naditil-panisatha-ghatlyane-chikkodi-talukyat-chinta-vadhli/">कृष्णा नदीतील पाणीसाठा घटल्याने चिक्कोडी तालुक्यात चिंता वाढली</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/krishna-naditil-panisatha-ghatlyane-chikkodi-talukyat-chinta-vadhli/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>आमदार अभय पाटील यांच्याकडून राकसकोप धरणाची पाहणी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/aamdar-abhay-patil-yanchyakadun-rakaskop-dharanachi-pahani/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/aamdar-abhay-patil-yanchyakadun-rakaskop-dharanachi-pahani/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 23 Jun 2026 14:20:50 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[rakaskop dam]]></category>
		<category><![CDATA[water crisis]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17543</guid>

					<description><![CDATA[<p>पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना बेळगाव : शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आमदार अभय पाटील यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह राकसकोप धरणाची<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/aamdar-abhay-patil-yanchyakadun-rakaskop-dharanachi-pahani/">आमदार अभय पाटील यांच्याकडून राकसकोप धरणाची पाहणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आमदार अभय पाटील यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह राकसकोप धरणाची पाहणी केली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख जलस्रोतांपैकी असलेल्या या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याची त्यांनी प्रत्यक्ष माहिती घेतली.</p>
<p style="text-align: justify;">पाणीटंचाईची स्थिती लक्षात घेऊन आमदार पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि नागरिकांना पाण्याअभावी कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देश दिले.</p>
<p style="text-align: justify;">यावेळी त्यांनी शहरातील बंद पडलेल्या कूपनलिका त्वरित दुरुस्त करून कार्यान्वित करण्यास प्राधान्य द्यावे, असे सांगितले. तसेच ज्या प्रभागांमध्ये पाण्याची कमतरता अधिक आहे, त्या भागांत महापालिकेने तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.</p>
<p style="text-align: justify;">पाणीपुरवठ्याची स्थिती सातत्याने तपासून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.या पाहणी दौऱ्यात बेळगावच्या महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हनुमंत कोंगाळी, विविध नगरसेवक तसेच महानगरपालिका आणि जलमंडळाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/aamdar-abhay-patil-yanchyakadun-rakaskop-dharanachi-pahani/">आमदार अभय पाटील यांच्याकडून राकसकोप धरणाची पाहणी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/aamdar-abhay-patil-yanchyakadun-rakaskop-dharanachi-pahani/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
