<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>literary event Archives | News 24 Tass Marathi</title>
	<atom:link href="https://news24tassmarathi.in/category/literary-event/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://news24tassmarathi.in/category/literary-event/</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Sun, 28 Jun 2026 12:13:02 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0</generator>

<image>
	<url>https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/07/android-chrome-192x192-nobg-75x75.png</url>
	<title>literary event Archives | News 24 Tass Marathi</title>
	<link>https://news24tassmarathi.in/category/literary-event/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>कवितेतून मूल्यांची जोपासना आवश्यक</title>
		<link>https://news24tassmarathi.in/kavitetun-mulyanchi-jopasana-avashyak/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/kavitetun-mulyanchi-jopasana-avashyak/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 28 Jun 2026 12:13:01 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[literary event]]></category>
		<category><![CDATA[poet's conference]]></category>
		<category><![CDATA[workshop]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17695</guid>

					<description><![CDATA[<p>ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांचे प्रतिपादन बेळगाव : कविता म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा नसतो. कविता लिहिणे सोपे नसून ती एक जोखीम असते. आपण जे पाहतो, अनुभवतो,<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/kavitetun-mulyanchi-jopasana-avashyak/">कवितेतून मूल्यांची जोपासना आवश्यक</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<div class="wp-block-image">
<figure class="aligncenter size-full"><img fetchpriority="high" decoding="async" width="1200" height="675" src="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/1-2.webp" alt="" class="wp-image-17697" srcset="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/1-2.webp 1200w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/1-2-500x281.webp 500w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/1-2-300x169.webp 300w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/1-2-768x432.webp 768w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/1-2-133x75.webp 133w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/1-2-480x270.webp 480w" sizes="(max-width:767px) 480px, (max-width:1200px) 100vw, 1200px" /></figure>
</div>

<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांचे प्रतिपादन</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> कविता म्हणजे केवळ शब्दांचा फुलोरा नसतो. कविता लिहिणे सोपे नसून ती एक जोखीम असते. आपण जे पाहतो, अनुभवतो, ते कवितेत यायला हवे. कवितेतून मूल्यांची जोपासना करत चांगला आशय मांडणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी विजय चोरमारे यांनी केले.</p>
<p style="text-align: justify;">येथील शब्दगंध कविमंडळाच्या वतीने राज्य मराठी विकास संस्था, मुंबई यांच्या सहकार्याने रविवारी (दि. २८) मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्यलेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कविमंडळाचे अध्यक्ष प्रा. अशोक अलगोंडी होते.</p>
<p style="text-align: justify;">प्रारंभी मराठी विद्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष सुभाष ओउळकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक प्रा. अशोक अलगोंडी यांनी केले. बसवंत शहापूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यानंतर सुभाष ओउळकर यांचे उद्घाटनपर भाषण झाले.</p>
<p style="text-align: justify;">पुढे बोलताना विजय चोरमारे म्हणाले, जन्मापासूनच कविता आपल्या सोबत असते. त्यामुळे कविता आणि जगणे यांचा अतूट संबंध आहे. चांगली कविता लिहिण्यासाठी चांगले वाचक निर्माण होणे गरजेचे आहे. कविता लिहिण्यासाठी सर्वप्रथम वाचन वाढविण्याची आवश्यकता आहे. चांगली कविता लयीत नसून आशयात असते. आपल्या कवितेचे समीक्षक आपणच व्हायला हवे. कवितेचा केवळ रतीब घालण्यात अर्थ नसून ती कविता नेमका कोणता विचार देते, हे अधिक महत्त्वाचे आहे. कवींनी स्वतःचा स्वतःशी संवाद साधला पाहिजे. यातून चांगली कविता निर्माण होण्यास पोषक वातावरण तयार होते. टाळ्यांच्या मोहात अडकलेला कवी संपून जातो. कविता ही एक कलाकृती आहे, याचे भान ठेवून कवीने लेखन करावे.</p>


<p class="wp-block-paragraph"></p>


<div class="wp-block-image">
<figure class="aligncenter size-full"><img decoding="async" width="1200" height="675" src="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/2-4.webp" alt="" class="wp-image-17698" srcset="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/2-4.webp 1200w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/2-4-500x281.webp 500w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/2-4-300x169.webp 300w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/2-4-768x432.webp 768w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/2-4-133x75.webp 133w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/2-4-480x270.webp 480w" sizes="(max-width:767px) 480px, (max-width:1200px) 100vw, 1200px" /></figure>
</div>


<p class="wp-block-paragraph"></p>


<p style="text-align: justify;">यावेळी कवी अजय कांडर यांची मुलाखत सुधाकर गावडे आणि उर्मिला शहा यांनी घेतली. यावेळी कवी कांडर म्हणाले, &#8220;जेव्हा कविता मरते, तेव्हा भाषा मरते आणि भाषा मरताच संस्कृती नष्ट होते. भाषा वाचविण्याचे काम संस्कृती करते. कवितेतून वैश्विक विचार मांडण्याची गरज आहे. कवीने माणूस म्हणून लिखाण करावे. विचारांच्या अभिव्यक्तीसाठी कवीने सातत्याने लिहित राहिले पाहिजे. आतून हुंकार द्यावासा वाटणे, हीच कविता असते. विचारांची बांधिलकी असेल तर तुम्ही कविता लिहू शकता. सातत्याने लिहिल्याने स्वतःची चिकित्सा करता येते. कवितेची समज कशी वाढवावी, यासाठी काव्यलेखन कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरते.&#8221;</p>


<p class="wp-block-paragraph"></p>


<div class="wp-block-image">
<figure class="aligncenter size-full"><img decoding="async" width="1200" height="675" src="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/3-2.webp" alt="" class="wp-image-17699" srcset="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/3-2.webp 1200w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/3-2-500x281.webp 500w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/3-2-300x169.webp 300w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/3-2-768x432.webp 768w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/3-2-133x75.webp 133w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2026/06/3-2-480x270.webp 480w" sizes="(max-width:767px) 480px, (max-width:1200px) 100vw, 1200px" /></figure>
</div>


<p class="wp-block-paragraph"></p>


<p style="text-align: justify;">कार्यशाळेस प्रा. सुभाष सुंठणकर, प्राचार्य आनंद मेणसे, किशोर काकडे, विलास बेळगावकर, लेखक विलास माळी, कणकवलीचे कवी सत्यवान साटम, निशिगंधा गावकर, रेखा गद्रे, जितेंद्र रेडेकर, स्मिता किल्लेकर, स्मिता पाटील आदींसह मोठ्या संख्येने कवी, अभ्यासक आणि श्रोते उपस्थित होते. कार्यशाळेला कवींचा उदंड प्रतिसाद लाभला. गुरुनाथ किरमटे यांनी सूत्रसंचालन केले, तर अस्मिता आळतेकर यांनी आभार मानले.</p><p>The post <a href="https://news24tassmarathi.in/kavitetun-mulyanchi-jopasana-avashyak/">कवितेतून मूल्यांची जोपासना आवश्यक</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/kavitetun-mulyanchi-jopasana-avashyak/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>रविवारी काव्य लेखन कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती</title>
		<link>https://news24tassmarathi.in/ravivari-kavya-lekhan-karyashalela-manyavaranchi-upasthiti/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/ravivari-kavya-lekhan-karyashalela-manyavaranchi-upasthiti/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 27 Jun 2026 14:40:28 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[literary event]]></category>
		<category><![CDATA[workshop]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=17659</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव : शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ravivari-kavya-lekhan-karyashalela-manyavaranchi-upasthiti/">रविवारी काव्य लेखन कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> शब्दगंध कवी मंडळ संघ, बेळगाव यांच्या वतीने रविवार, दि. २८ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मराठी विद्यानिकेतनच्या सभागृहात काव्य लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.</p>
<p style="text-align: justify;">या कार्यशाळेचे उद्घाटन ज्येष्ठ शिक्षणप्रेमी सुभाष ओऊळकर यांच्या हस्ते होणार असून, प्रसिद्ध कवी अजय कांडर आणि कवी, पत्रकार विजय चोरमारे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.</p>
<p style="text-align: justify;">कार्यशाळेमध्ये कविता म्हणजे काय?, कवितेचे स्वरूप, कवितेचे विविध प्रकार, मराठी कवितेचा प्रवास, आधुनिक मराठी कविता, कवितेची निर्मिती प्रक्रिया, चांगल्या कवितेची वैशिष्ट्ये, प्रभावी कविता कशी लिहावी, प्रात्यक्षिक, प्रश्नोत्तरे, शंका निरसन आणि खुली चर्चा या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.</p>
<ul style="text-align: justify;">
<li><strong>अजय कांडर परिचय :</strong></li>
</ul>
<p style="text-align: justify;">समकालीन मराठी कवितेतील महत्त्वाचे कवी म्हणून अजय कांडर यांची ओळख आहे. आवानओल, हत्ती इलो, युगानुयुगे तूच आणि अजूनही जिवंत आहे गांधी हे त्यांचे गाजलेले कवितासंग्रह आहेत. महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कवितांचे विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झाले असून अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध साहित्य संमेलनांत त्यांनी मराठीचे प्रतिनिधित्व केले आहे.</p>
<ul style="text-align: justify;">
<li><strong>विजय चोरमारे परिचय :</strong></li>
</ul>
<p style="text-align: justify;">प्रसिद्ध पत्रकार, कवी आणि लेखक विजय चोरमारे यांनी १९८७ पासून पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. दैनिक सकाळ, लोकमत, प्रहार आणि महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये त्यांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. पापण्यांच्या प्रदेशात, शहर मातीच्या शोधात, आतबाहेर सर्वत्र आणि स्तंभसूक्त हे त्यांचे कवितासंग्रह विशेष गाजले आहेत. पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांतील त्यांच्या कार्याचा विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.</p>
<p style="text-align: justify;">कविता लेखनाची आवड असलेल्या नवोदित कवी, साहित्य अभ्यासक, विद्यार्थी तसेच रसिकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ravivari-kavya-lekhan-karyashalela-manyavaranchi-upasthiti/">रविवारी काव्य लेखन कार्यशाळेला मान्यवरांची उपस्थिती</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/ravivari-kavya-lekhan-karyashalela-manyavaranchi-upasthiti/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
