<?xml version="1.0" encoding="UTF-8"?><rss version="2.0"
	xmlns:content="http://purl.org/rss/1.0/modules/content/"
	xmlns:wfw="http://wellformedweb.org/CommentAPI/"
	xmlns:dc="http://purl.org/dc/elements/1.1/"
	xmlns:atom="http://www.w3.org/2005/Atom"
	xmlns:sy="http://purl.org/rss/1.0/modules/syndication/"
	xmlns:slash="http://purl.org/rss/1.0/modules/slash/"
	>

<channel>
	<title>cricket Archives | News 24 Tass Marathi</title>
	<atom:link href="https://news24tassmarathi.in/category/cricket/feed/" rel="self" type="application/rss+xml" />
	<link>https://news24tassmarathi.in/category/cricket/</link>
	<description></description>
	<lastBuildDate>Sun, 31 May 2026 18:21:34 +0000</lastBuildDate>
	<language>en-US</language>
	<sy:updatePeriod>
	hourly	</sy:updatePeriod>
	<sy:updateFrequency>
	1	</sy:updateFrequency>
	<generator>https://wordpress.org/?v=7.0</generator>

<image>
	<url>https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/07/android-chrome-192x192-nobg-75x75.png</url>
	<title>cricket Archives | News 24 Tass Marathi</title>
	<link>https://news24tassmarathi.in/category/cricket/</link>
	<width>32</width>
	<height>32</height>
</image> 
	<item>
		<title>आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन !</title>
		<link>https://news24tassmarathi.in/rcb-salag-dusryanda-ipl-champion/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/rcb-salag-dusryanda-ipl-champion/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 31 May 2026 18:21:34 +0000</pubDate>
				<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[indian premier league]]></category>
		<category><![CDATA[National]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16928</guid>

					<description><![CDATA[<p>अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव अहमदाबाद : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत गुजरात टायटन्सवर मात केली आणि<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/rcb-salag-dusryanda-ipl-champion/">आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन !</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>अहमदाबाद :</strong> रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात दमदार कामगिरी करत गुजरात टायटन्सवर मात केली आणि सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याचा मान मिळवला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या रंगतदार सामन्यात बंगळुरूने १५६ धावांचे लक्ष्य १८ षटकांत पूर्ण करत ट्रॉफीवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले.</p>
<p style="text-align: justify;">लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात भक्कम झाली. सलामीवीर विराट कोहली आणि वेंकटेश अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी उभारून संघाचा पाया मजबूत केला. अय्यरने ३२ धावांचे योगदान दिले, तर विराट कोहलीने नाबाद ७५ धावांची खेळी साकारत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. देवदत्त पडिक्कलला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर टीम डेव्हिडने २४ धावा केल्या, तर कृणाल पंड्या एक धावेवर बाद झाला. अखेरीस विराटच्या षटकाराने बंगळुरूच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.</p>
<p style="text-align: justify;">यापूर्वी नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीस उतरलेल्या गुजरात टायटन्सला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही. साई सुदर्शन १२ आणि कर्णधार शुबमन गिल १० धावांवर माघारी परतल्याने संघ दबावात आला. निशांत सिंधूने २० धावा केल्या, तर जोस बटलर १९ धावांवर बाद झाला. मधल्या फळीत अर्शद खानने १५, राहुल तेवतिया आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी ७ धावांचे योगदान दिले. अखेर वॉशिंग्टन सुंदरने संयमी अर्धशतक झळकावत नाबाद ५० धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे गुजरातने २० षटकांत ८ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली.</p>
<ul>
<li style="text-align: justify;"><strong>सलग दोन हंगामांतील ऐतिहासिक यश :</strong></li>
</ul>
<p style="text-align: justify;">आयपीएलच्या सुरुवातीपासून अनेक वर्षे विजेतेपदाची प्रतीक्षा करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या दोन हंगामांत इतिहास रचला आहे. रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली संघाने प्रथम मागील हंगामात पंजाब किंग्सचा पराभव करून पहिले जेतेपद जिंकले होते. त्यानंतर २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सवर विजय मिळवत बंगळुरूने विजेतेपदाचे यशस्वी संरक्षण केले आणि सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन बनण्याचा पराक्रम केला.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/rcb-salag-dusryanda-ipl-champion/">आरसीबी सलग दुसऱ्यांदा आयपीएल चॅम्पियन !</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/rcb-salag-dusryanda-ipl-champion/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>आयपीएल फायनलनंतर सार्वजनिक जल्लोषावर बंदी</title>
		<link>https://news24tassmarathi.in/ipl-finalnantar-sarvajanik-jalloshavar-bandi/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/ipl-finalnantar-sarvajanik-jalloshavar-bandi/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sat, 30 May 2026 21:00:23 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[Important News]]></category>
		<category><![CDATA[police department]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=16908</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव पोलिसांचा इशारा बेळगाव : टाटा आयपीएल २०२६ स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने स्थान मिळवल्यानंतर संभाव्य जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी विशेष खबरदारीचे<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ipl-finalnantar-sarvajanik-jalloshavar-bandi/">आयपीएल फायनलनंतर सार्वजनिक जल्लोषावर बंदी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>बेळगाव पोलिसांचा इशारा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> टाटा आयपीएल २०२६ स्पर्धेच्या अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाने स्थान मिळवल्यानंतर संभाव्य जल्लोषाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहर पोलिसांनी विशेष खबरदारीचे उपाय जाहीर केले आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांसाठी विविध मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.</p>
<p style="text-align: justify;">पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनानुसार, ३१ मे रोजी अंतिम सामना संपल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक मिरवणुका, विजय उत्सव किंवा रस्त्यावर होणाऱ्या जल्लोषाला परवानगी दिली जाणार नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी सामना दाखविण्यासाठी एलईडी स्क्रीन किंवा वॉल उभारायची असल्यास संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था अथवा महापालिकेची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. याशिवाय आधीपासून उभारलेल्या बाह्य एलईडी स्क्रीनवर सामना प्रसारित करण्यासही मनाई करण्यात आली आहे.</p>
<p style="text-align: justify;">फटाके फोडणे, धोकादायक वस्तूंचा वापर करणे, वाहतुकीस अडथळा निर्माण करणे, दुचाकी किंवा वाहनांच्या रॅली काढणे, बेफाम वेगाने वाहन चालविणे, स्टंट करणे, विनाकारण हॉर्न वाजविणे अथवा रस्त्यांवर गर्दी करून गोंधळ घालणे यासारख्या प्रकारांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.</p>
<p style="text-align: justify;">याशिवाय सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे, भांडणे, असभ्य वर्तन करणे किंवा कोणत्याही प्रकारे शांतता भंग करणाऱ्या कृतींवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सोशल मीडियावर अफवा, द्वेषपूर्ण संदेश किंवा चिथावणीखोर पोस्ट प्रसारित करणाऱ्यांविरोधातही कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. तसेच प्रतिस्पर्धी संघांच्या समर्थकांना उद्देशून वादग्रस्त वक्तव्ये किंवा चिथावणीखोर वर्तन टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.</p>
<p style="text-align: justify;">सामन्यानंतर शहरात मद्यधुंद वाहनचालकांविरोधात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून १५ अल्कोमीटरच्या साहाय्याने वाहनचालकांची तपासणी केली जाईल. तसेच धारदार शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष ‘अँटी-स्टॅबिंग स्क्वॉड’ तैनात राहणार आहे. कारवाईदरम्यान पोलिसांकडून बॉडी-वॉर्न कॅमेऱ्यांचाही वापर केला जाणार आहे.</p>
<p style="text-align: justify;">मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी १० हजार रुपयांपर्यंत दंड आणि सहा महिन्यांपर्यंत कारावासाची तरतूद आहे. पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केल्यास १५ हजार रुपयांचा दंड, दोन वर्षांपर्यंत कारावास तसेच वाहन परवाना रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.</p>
<p style="text-align: justify;">शहरातील शांतता, सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी केले आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ipl-finalnantar-sarvajanik-jalloshavar-bandi/">आयपीएल फायनलनंतर सार्वजनिक जल्लोषावर बंदी</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/ipl-finalnantar-sarvajanik-jalloshavar-bandi/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>भारत &#8216;विश्वविजेता&#8217;…सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर कोरलं नाव !</title>
		<link>https://news24tassmarathi.in/bharat-vishwavijeta-salag-dusryanda-jetepadavar-korl-naav/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/bharat-vishwavijeta-salag-dusryanda-jetepadavar-korl-naav/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 08 Mar 2026 18:02:14 +0000</pubDate>
				<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[icc t20 world cup]]></category>
		<category><![CDATA[National]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=14465</guid>

					<description><![CDATA[<p>अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा अहमदाबाद : येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज टी &#8211; २० वर्ल्ड कपच्या २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/bharat-vishwavijeta-salag-dusryanda-jetepadavar-korl-naav/">भारत &#8216;विश्वविजेता&#8217;…सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर कोरलं नाव !</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>अहमदाबाद :</strong> येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज टी &#8211; २० वर्ल्ड कपच्या २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे, टीम इंडियाने सलग दोन टी-२० वर्ल्ड कप जिंकणारा पहिला संघ बनण्याचा मान मिळवला आहे. न्यूझीलंडसमोर २५६ धावांचा डोंगर उभा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनीही कमाल दाखवत किवी संघाचा पराभव केला.</p>
<p style="text-align: justify;">जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या घातक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव १५९ धावांवरच आटोपला आणि भारताने ९६ धावांनी दणदणीत विजय मिळवत तिसऱ्यांदा टी-२०विश्वचषक पटकावले. हा केवळ विजय नव्हता, तर भारतीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाणारा अभिमानाचा क्षण होता.</p>
<p style="text-align: justify;">न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतातर्फे सलामीच्या संजू सॅमसनने सलग तिसऱ्या सामन्यात झळकावलेले वेगवान अर्धशतक भारताच्या या डावाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. त्याने ४६ चेंडूत पाच चौकार आणि आठ षटकारांसह ८९ धावांची खेळी उभारली. संजू सॅमसननं अभिषेक शर्मा समवेत पहिल्या विकेटसाठी ९८ धावांची आणि ईशान किशनच्या साथीने दुसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली.</p>
<p style="text-align: justify;">संपूर्ण स्पर्धेत धावांसाठी झगडणाऱ्या अभिषेक शर्माने सावध सुरुवात केली. संजूने मॉट हेन्रीच्या पहिल्याच षटकात खणखणीत षटकार लगावत इरादे स्पष्ट केले. न्यूझीलंडने दुसरे षटक फिरकीपटू ग्लेन फिलीप्सला दिले. या स्पर्धेत भारतीय फलंदाज सातत्याने फिरकीपटूंना बाद होत असल्याचे आकडे सांगत होते. त्यामुळे संजू-अभिशेकने फिलीप्सविरुद्ध धोका पत्करला नाही. स्पर्धेतला केवळ दुसराच सामना खेळणाऱ्या जेकब डफीच्या पहिल्या षटकात अभिषेकने दोन तर संजूने एक चौकार लगावला. या षटकाने दोघांना खेळपट्टीचा अंदाज आला. लॉकी फर्ग्युसनचा वेग या दोघांना अडचणीत आणेल अशी चिन्हे होती. मात्र अत्यंत स्वैर गोलंदाजी करणाऱ्या लॉकीच्या गोलंदाजीवर या जोडीने जोरदार आक्रमण केले. फर्ग्युसनच्या पहिल्याच षटकात या दोघांनी २४ धावा वसूल केल्या. हेन्रीच्या पुढच्या षटकात दोघांनी २१ धावा चोपून काढल्या. पॉवरप्लेचे शेवटचे षटक डफीला देण्याचा सँटनरचा निर्णय पूर्णत: चुकला. या दोघांच्या आक्रणमासमोर डफीची लय हरपली. क्षेत्ररक्षणाचे निर्बंध असणाऱ्या या षटकात संजू-अभिषेक जोडीने २० धावा कुटल्या. पॉवरप्लेच्या ६ षटकात ९२ धावांची सलामी देत या जोडीने जणू विजयाचा पाया रचला. याच षटकात अभिषेकने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतकाला गवसणी घातली.</p>
<p style="text-align: justify;">पॉवरप्ले संपताच संजू-अभिषेक जोडीचा वेग काहीसा मंदावला. रचीन रवींद्रने अभिषेकला बाद केले. टीम सैफर्टने अतिशय सुरेख झेल टिपला. अभिषेकने २१ चेंडूत ५२ धावांची वादळी खेळी साकारली. इशान किशनने अभिषेकचाच कित्ता गिरवत खेळपट्टीवर दाखल झाल्यापासून चौकार-षटकारांना सुरुवात केली. संजू- इशान जोडीने पॉवरप्ले संपल्यानंतरही चौकार- षटकारांची लयलूट कायम राखत भारतीय संघ मोठी धावसंख्या रचेल याची काळजी घेतली. १० षटकात भारतीय संघाने १२७ धावा पटावर नोंदवल्या. वेस्ट इंडिज आणि इंग्लंडविरुद्धचा झंझावाती फॉर्म कायम राखत संजूने सँटनरच्या चेंडूवर एक धाव घेत अर्धशतक पूर्ण केले. फर्ग्युसनला लक्ष्य करत संजू-ईशान जोडीने २४ धावा लुटल्या. रचीन रवींद्रच्या षटकात संजूने षटकारांची हॅट्रिक केली. या भागीदारीच्या बळावरच भारतीय संघाने टी२० वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मागे टाकला.</p>
<p style="text-align: justify;">शतकाकडे वेगवान वाटचाल करणाऱ्या संजूला जेमी नीशामने रोखले. लॉना ऑनच्या डोक्यावर षटकार लगावण्याचा संजूचा प्रयत्न बदली खेळाडू मॅकहोनीच्या हातात जाऊन विसावला. संजूने फायनलसारख्या दडपणाच्या सामन्यात ४६ चेंडूत ५ चौकार आणि ८ षटकारांसह ८९ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. धावसंख्या वाढवण्याच्या नादात याच षटकात ईशाननेही आपली विकेट गमावली. त्याने २५ चेंडूत ५४ धावांची वेगवान खेळी केली. या जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ४८ चेंडूत १०५ धावांची अतिवेगवान भागीदारी साकारली. खेळपट्टीवर आल्या आल्या सुपला फटका खेळायचा सूर्यकुमार यादवचा प्रयत्न रवींद्रने सफल होऊ दिला नाही. कर्णधार सूर्याला महत्त्वपूर्ण लढतीत भोपळाही फोडता आला नाही. हार्दिक पंड्या १८ धावा करून तंबूत परतला. शेवटच्या षटकात २४ धावा चोपून काढत भारतीय संघाने २५५ धावांचा डोंगर उभारला.</p>
<p style="text-align: justify;">दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३३ चेंडूत शतक झळकावणाऱ्या फिन ॲलनला अक्षर पटेलने बाद करत न्यूझीलंडला पहिला दणका दिला.ॲलनकडून न्यूझीलंडला मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तिसऱ्याच षटकात अक्षरने त्याची खेळी संपुष्टात आणली. पुढच्याच षटकात जसप्रीत बुमराहच्या स्लोअरवन चेंडूवर रचीन रवींद्र फसला. अक्षर पटेलच्या फिरकीचे कोडे ग्लेन फिलीप्स सोडवू शकला आणि त्रिफळाचीत झाला. हार्दिक पंड्याचा ऑफस्टंपबाहेरचा चेंडू मारायच्या प्रयत्नाच चेंडू स्टंप्सवर आदळला. अर्धशतक पूर्ण केलेल्या वरुण चक्रवर्तीने बाद केले. जसप्रीत बुमराहने अवघ्या १५ धावा देत न्यूझीलंडच्या चार फलंदाजांना माघारी धाडले.</p>
<p style="text-align: justify;">भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांनी अचूक आणि घातक गोलंदाजी करत किवी फलंदाजांना जखडून ठेवले. नियमित अंतराने विकेट्स घेत भारताने सामन्यावर पकड मजबूत केली. दबावाखाली खेळणाऱ्या न्यूझीलंडच्या फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. परिणामी संपूर्ण संघ १५९ धावांवर मर्यादित राहिला आणि भारताने हा सामना ९६ धावांनी जिंकला.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/bharat-vishwavijeta-salag-dusryanda-jetepadavar-korl-naav/">भारत &#8216;विश्वविजेता&#8217;…सलग दुसऱ्यांदा जेतेपदावर कोरलं नाव !</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/bharat-vishwavijeta-salag-dusryanda-jetepadavar-korl-naav/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>टीम इंडियाचा दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश</title>
		<link>https://news24tassmarathi.in/team-indiacha-dimakhat-antim-ferit-pravesh/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/team-indiacha-dimakhat-antim-ferit-pravesh/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Thu, 05 Mar 2026 18:12:07 +0000</pubDate>
				<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[icc t20 world cup]]></category>
		<category><![CDATA[National]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=14377</guid>

					<description><![CDATA[<p>रोमांचक सामन्यात इंग्लंडचा ७ धावांनी धुव्वा विजेतेपदासाठी न्यूझीलंडशी लढत मुंबई : वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने बलाढ्य इंग्लंडचा ७<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/team-indiacha-dimakhat-antim-ferit-pravesh/">टीम इंडियाचा दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>रोमांचक सामन्यात इंग्लंडचा ७ धावांनी धुव्वा</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>विजेतेपदासाठी न्यूझीलंडशी लढत</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>मुंबई :</strong> वानखेडेच्या ऐतिहासिक मैदानावर टी-२० विश्वचषक २०२६ च्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात टीम इंडियाने बलाढ्य इंग्लंडचा ७ धावांनी धुव्वा उडवत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. संजू सॅमसन, ईशान किशन आणि शिवम दुबे यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर भारताने २५३ धावांचा डोंगर उभा केला होता. त्याला इंग्लंडकडून जेकब बेथेलने शेवटपर्यंत एकाकी झुंज दिली. मात्र इंग्लंडचा संघ २४६ धावांत गारद झाला.</p>
<p style="text-align: justify;">२५४ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात पण धक्कादायक झाली. हार्दिक पांड्याने दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर भारताला पहिले यश मिळवून देत फिल साल्टला ५ धावांवर बाद केले.त्यानंतर हॅरी ब्रूकही मोठी खेळी करू शकला नाही, तो ७ धावा करून जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर अक्षर पटेलकडे झेल देत माघारी परतला. जोस बटलर मात्र चांगल्या लयीत दिसत होता, पण त्याची खेळीही फार काळ टिकली नाही. २५ धावांवर असताना फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याचा त्रिफळा उडवत इंग्लंडला मोठा धक्का दिला. यानंतर टॉम बॅन्टनने (१७) अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर दोन गगनचुंबी षटकार ठोकत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलनेच त्याला लगेच बाद करत इंग्लंडला आणखी एक धक्का दिला. जेकब बेथेलने एकाकी झूज दिली. त्याने आधी अवघ्या १९ चेंडूमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर त्याने ४५ चेंडूत शतक ठोकले, पण तो संघाला विजय मिळून देऊ शकला नाही.</p>
<p style="text-align: justify;">प्रारंभी इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिले. मात्र टीम इंडियाची सुरुवात काहीशी निराशाजनक झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याने ७ चेंडूत २ चौकारांच्या मदतीने केवळ ९ धावा केल्या. पण, यानंतर संजू सॅमसन आणि ईशान किशन यांनी डाव सावरत भारतीय संघाला शंभरी पार करून दिली. ईशान किशनने आक्रमक फलंदाजी करत १८ चेंडूत ३९ धावा केल्या.</p>
<p style="text-align: justify;">दुसऱ्या बाजूला संजू सॅमसनने धडाकेबाज अर्धशतक झळकावले. तो ४२ चेंडूत ७ चौकार आणि ७ षटकारांच्या जोरावर ८९ धावा करून बाद झाला. सॅमसन बाद झाल्यानंतर शिवम दुबेने तुफानी फलंदाजी करत २५ चेंडूत ४३ धावा ठोकल्या. मात्र, दुर्दैवाने तो धावबाद झाला. दुसरीकडे सूर्यकुमार यादव पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्याला ६ चेंडूत ११ धावा करता आल्या. यानंतर तिलक वर्माने अवघ्या ७ चेंडूत ३ षटकारांसह २१ धावांची झंझावाती खेळी केली, तर हार्दिक पांड्याने १२ चेंडूत २७ धावा जलदगतीने धावा जमविल्या. जोरावर भारताने २० षटकांत ७ बाद २५३ धावांचा डोंगर उभारला.</p>
<p style="text-align: justify;">आता रविवारी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषक २०२६ चा अंतिम सामना रंगणार आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/team-indiacha-dimakhat-antim-ferit-pravesh/">टीम इंडियाचा दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/team-indiacha-dimakhat-antim-ferit-pravesh/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक</title>
		<link>https://news24tassmarathi.in/team-indiachi-semi-finalmadhe-dhadak/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/team-indiachi-semi-finalmadhe-dhadak/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 01 Mar 2026 17:55:45 +0000</pubDate>
				<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[National]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=14300</guid>

					<description><![CDATA[<p>संजू सॅमसनची मॅचविनिंग खेळी सुपर ८ मधील अंतिम सामन्यात वेस्टइंडिजचा ५ विकेट्सने धुव्वा कोलकाता : आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील निर्णायक सामन्यात भारताने<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/team-indiachi-semi-finalmadhe-dhadak/">टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>संजू सॅमसनची मॅचविनिंग खेळी</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>सुपर ८ मधील अंतिम सामन्यात वेस्टइंडिजचा ५ विकेट्सने धुव्वा</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>कोलकाता :</strong> आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील निर्णायक सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर ५ विकेट्सने दमदार विजय मिळवत सेमी फायनलमध्ये धडक मारली. कोलकाता येथील ईडन गार्डन मैदानावर झालेल्या या सामन्यात विजयासाठी १९६ धावांचे आव्हान पार करताना संजू सॅमसनने नाबाद ९७ धावांची अप्रतिम खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.</p>
<p style="text-align: justify;">१९६ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात डळमळीत झाली. अभिषेक शर्मा (१०) आणि ईशान किशन (१०) स्वस्तात माघारी परतले. कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती; मात्र तो १८ धावांवर बाद झाला.</p>
<p style="text-align: justify;">यानंतर तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तिलक २७ धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्या याने १७ धावांचे योगदान दिले. मात्र संजू सॅमसन शेवटपर्यंत क्रीजवर ठाम उभा राहिला. त्याने नाबाद ९७ धावांची खेळी करत भारताचा विजय निश्चित केला.</p>
<p style="text-align: justify;">प्रारंभी , नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजने ४ गडी बाद १९५ धावा केल्या. शे होप (३२) आणि रोस्टन चेसने (४०) यांनी पहिल्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. शिमरन हेटमायरला २७ धावांवर बाद झाला, तर रुथरफोर्डने १४ धावा केल्या. शेवटच्या षटकांत रोमन पॉवेलने (नाबाद ३४) आणि जेसन होल्डरने (नाबाद ३७) यांनी धावा जोडत संघाला १९५ पर्यंत मझल मारून दिली. महत्त्वाच्या सामन्यात दडपणाखाली खेळताना भारताने संयम राखत विजय मिळवला आणि सेमी फायनलच्या दिशेने दमदार पाऊल टाकले.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/team-indiachi-semi-finalmadhe-dhadak/">टीम इंडियाची सेमी फायनलमध्ये धडक</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/team-indiachi-semi-finalmadhe-dhadak/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>केएससीए धारवाड विभागातर्फे माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा सत्कार</title>
		<link>https://news24tassmarathi.in/ksca-dharwad-vibhagatarfe-maji-cricketpatu-sunil-joshi-yancha-satkar/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/ksca-dharwad-vibhagatarfe-maji-cricketpatu-sunil-joshi-yancha-satkar/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Tue, 24 Feb 2026 15:25:36 +0000</pubDate>
				<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[Dharwad]]></category>
		<category><![CDATA[felicitation]]></category>
		<category><![CDATA[Hubli]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=14186</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) धारवाड विभागातर्फे माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा हुबळी येथे आज शताब्दी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. केएससीए धारवाड<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ksca-dharwad-vibhagatarfe-maji-cricketpatu-sunil-joshi-yancha-satkar/">केएससीए धारवाड विभागातर्फे माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा सत्कार</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (केएससीए) धारवाड विभागातर्फे माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा हुबळी येथे आज शताब्दी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.</p>
<p style="text-align: justify;">केएससीए धारवाड विभागाचे निमंत्रक अविनाश पोतदार यांच्या हस्ते आज मंगळवारी माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा हुबळी येथे म्हैसूरी पगडी व शाल घालण्यासह विभागाचे शताब्दी स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अविनाश वैद्य, वीरण्णा सवदी, अल्ताफ कित्तूर, दयानंद शेट्टी, वसंत मुर्डेश्वर आदी उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/ksca-dharwad-vibhagatarfe-maji-cricketpatu-sunil-joshi-yancha-satkar/">केएससीए धारवाड विभागातर्फे माजी क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा सत्कार</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/ksca-dharwad-vibhagatarfe-maji-cricketpatu-sunil-joshi-yancha-satkar/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची बेळगावला धावती भेट</title>
		<link>https://news24tassmarathi.in/cricket-prashikshak-dinesh-lad-yanchi-belgavla-dhavti-bhet/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/cricket-prashikshak-dinesh-lad-yanchi-belgavla-dhavti-bhet/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Mon, 23 Feb 2026 14:21:09 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[Maharashtra]]></category>
		<category><![CDATA[Mumbai]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=14161</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव : मुंबईचे नामवंत क्रिकेट प्रशिक्षक श्री दिनेश लाड यांनी बेळगाव शिक्षण सोसायटीच्या आवारातील बेळगाव स्पोर्ट्स क्लब च्या प्रशिक्षण केंद्राला धावती भेट देऊन नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/cricket-prashikshak-dinesh-lad-yanchi-belgavla-dhavti-bhet/">क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची बेळगावला धावती भेट</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> मुंबईचे नामवंत क्रिकेट प्रशिक्षक श्री दिनेश लाड यांनी बेळगाव शिक्षण सोसायटीच्या आवारातील बेळगाव स्पोर्ट्स क्लब च्या प्रशिक्षण केंद्राला धावती भेट देऊन नवोदित खेळाडूंना मार्गदर्शन केले. सोसायटीचे चेअरमन आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अविनाश पोतदार, स्पोर्ट्स क्लबचे कार्यकारी अध्यक्ष दीपक पवार यांच्या हस्ते दिनेश लाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अविनाश पोतदार यांनी बेळगाव क्रिकेटच्या गौरवशाली इतिहासाबद्दल आणि वाटचालीबद्दल माहिती देऊन जुन्या खेळाडूंच्या योगदानाचा गौरव केला तसेच &#8220;दिनेश लाड यांनी रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड यासारख्या खेळाडूंना कसे घडविले याचीही माहिती दिली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने त्यांचा छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार तर भारत सरकारने द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरव केला आहे &#8220;अशी माहितीही श्री. पोतदार यांनी दिली.</p>
<p style="text-align: justify;">सत्काराला उत्तर देताना दिनेश लाड यांनी खेळाडूंनी यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. खेळाडूंच्या जडणघडणीत पालकांचा व प्रशिक्षकांचा कसा सहभाग असावा याबद्दलही मार्गदर्शन केले. बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या कार्याची स्तूती करून त्यांची वाटचाल गौरवशाली असेल अशी अशा व्यक्ती केली. यावेळी दिनेश लाड यांच्याहस्ते जुने खेळाडू श्री ज्ञानेश्वर श्रेयकर यांचा बॅट देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बी. के. मॉडेल शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. जोशी, रवी घाटगे, बाळकृष्ण पाटील, विजयकुमार पाटील, विठ्ठल भट्ट ,आनंद करडी या मान्यवरांसह मोठ्या संख्येने युवा खेळाडू व पालक उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/cricket-prashikshak-dinesh-lad-yanchi-belgavla-dhavti-bhet/">क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड यांची बेळगावला धावती भेट</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/cricket-prashikshak-dinesh-lad-yanchi-belgavla-dhavti-bhet/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयी ‘अभिषेक’</title>
		<link>https://news24tassmarathi.in/mahashivratrila-team-indiacha-vijayi-abhishek/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/mahashivratrila-team-indiacha-vijayi-abhishek/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Sun, 15 Feb 2026 17:43:42 +0000</pubDate>
				<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[National]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=13957</guid>

					<description><![CDATA[<p>कोलंबोतील महामुकाबल्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव टीम इंडियाची सुपर-८ मध्ये धडक कोलंबो – महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर टीम इंडियाने विजयाचा ‘अभिषेक’ करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/mahashivratrila-team-indiacha-vijayi-abhishek/">महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयी ‘अभिषेक’</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>कोलंबोतील महामुकाबल्यात पाकिस्तानचा ६१ धावांनी पराभव</strong></span></li>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>टीम इंडियाची सुपर-८ मध्ये धडक</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>कोलंबो –</strong> महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर टीम इंडियाने विजयाचा ‘अभिषेक’ करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत मात केली. आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक स्पर्धेतील या लढतीत भारताने सलग तिसरा विजय नोंदवत सुपर-८ फेरीतील स्थान जवळपास निश्चित केले.</p>
<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #000000;"><strong>पाकिस्तानचा पाठलाग कोलमडला :</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;">१७६ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पाकिस्तानची सुरुवात अत्यंत खराब झाली. हार्दिक पंड्याने पहिल्याच षटकात साहिबजाहा फरहानला बाद केले. जसप्रीत बुमराहच्या भेदक यॉर्करसमोर सईम अयुब अपयशीठरला, तर सलमान अली अघाही फटकेबाजीच्या नादात बाद झाला. पॉवरप्लेमध्येच तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने पाकिस्तानचा डाव ढासळला.</p>
<p style="text-align: justify;">बाबर आझमने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र अक्षर पटेलने त्याला त्रिफळाचीत केले. उस्मान खानने ४४ धावांची एकाकी झुंज दिली; पण इतर फलंदाजांनी साथ न दिल्याने पाकिस्तानचा डाव ११४ धावांतच संपुष्टात आला. भारताकडून हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.</p>
<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #000000;"><strong>भारताचा डाव ; इशानची आक्रमक खेळी :</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;">प्रारंभी, कोलंबोतील प्रमदासा स्टेडियममध्ये पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार सलमान अली अघाने पहिल्याच षटकात फिरकीचा वापर करत अभिषेक शर्माला बाद केले. सुरुवातीला भारतावर दबाव निर्माण झाला असला तरी इशान किशनने आक्रमक फलंदाजी करत डाव सावरला.</p>
<p style="text-align: justify;">इशानने ४० चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांसह ७७ धावांची दमदार खेळी केली आणि भारताच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. तिलक वर्मा (२५) आणि सूर्यकुमार यादव (३२) यांनी उपयुक्त धावा केल्या. हार्दिक पंड्या धावसंख्या न वाढवता बाद झाला ; मात्र शिवम दुबेने १७ चेंडूत २७ धावांचे योगदान दिले. भारताने निर्धारित २० षटकांत १७५ धावा केल्या. पाकिस्तानकडून सईम अयुबने तीन विकेट्स घेतल्या.</p>
<p style="text-align: justify;">या विजयामुळे भारताचे तीनपैकी तीन सामने जिंकून गुणतालिकेत स्थान भक्कम झाले आहे. दुसरीकडे पाकिस्तानसमोर बाद फेरीत प्रवेशासाठी मोठे आव्हान उभे राहिले आहे.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/mahashivratrila-team-indiacha-vijayi-abhishek/">महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयी ‘अभिषेक’</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/mahashivratrila-team-indiacha-vijayi-abhishek/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>कर्नाटकात क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीचे आश्वासन</title>
		<link>https://news24tassmarathi.in/commitment-to-improve-cricket-infrastructure-in-karnataka/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/commitment-to-improve-cricket-infrastructure-in-karnataka/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Dec 2025 16:46:02 +0000</pubDate>
				<category><![CDATA[Belgaum]]></category>
		<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[Karnataka]]></category>
		<category><![CDATA[pressmeet]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=12337</guid>

					<description><![CDATA[<p>बेळगाव स्टेडियम केंद्रस्थानी : केएससीए अध्यक्ष वेंकटेश प्रसाद बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी राज्यातील क्रिकेट<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/commitment-to-improve-cricket-infrastructure-in-karnataka/">कर्नाटकात क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीचे आश्वासन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>बेळगाव स्टेडियम केंद्रस्थानी : केएससीए अध्यक्ष वेंकटेश प्रसाद</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>बेळगाव :</strong> कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसाद यांनी राज्यातील क्रिकेट पायाभूत सुविधांच्या जलद उन्नतीचे आश्वासन दिले आहे. “राजकारण दूर ठेवून, राज्यातील क्रिकेट उच्चस्तरावर नेणे हेच आमचे उद्दिष्ट,” असे ते म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">बुधवारी बेळगाव कणबर्गी येथील केएससीए स्टेडियममध्ये पत्रकार परिषदेत वेंकटेश प्रसाद यांनी सांगितले की, मैदानाची गुणवत्ता योग्य असली तरी स्टेडियममध्ये अनेक महत्त्वाच्या सुधारणा तातडीने आवश्यक आहेत.</p>
<p style="text-align: justify;">“तीन वर्षांपासून येथे विकासकामे अजिबात पुढे सरकलेली नाहीत. अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांनी सुरु केलेली कामे अपूर्ण आहेत. आम्ही त्वरित सुधारणा करून स्टेडियमचा सर्वांगिण विकास करू,” असे त्यांनी स्पष्ट केले.</p>
<p style="text-align: justify;">मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, चिन्नास्वामी स्टेडियमवरील आयपीएल २०२५ विजयोत्सवातील दुःखद घटनेबाबत राज्य सरकार आणि बीसीसीआय पूर्ण सहकार्य करत आहेत. या घटनेमुळे काही महत्त्वाचे सामने रद्द झाले असले तरी, बीसीसीआय ने भरपाई म्हणून द्विपक्षीय मालिका आणि आयपीएलच्या सुरुवातीचे सामने देण्याचे आश्वासन दिले आहे.</p>
<p style="text-align: justify;">नव्या समितीने पदभार स्वीकारताच राज्यभरातील क्रिकेट केंद्रांची पाहणी सुरू केली असून, बेळगाव, हुबळी, शिमोगा, तुमकुर यांसह सर्व केंद्रांमध्ये जलद गतीने सुधारणा करण्याचे नियोजन आहे.</p>
<p style="text-align: justify;">“बेळगाव हे आमच्या प्राथमिकतेतील केंद्र आहे. येथे नियमितपणे दर्जेदार सामने आयोजित केले जातील, ज्यामुळे स्थानिक क्रिकेटपटूंना मोठी संधी मिळेल,” असे प्रसाद म्हणाले.</p>
<p style="text-align: justify;">पत्रपरिषदेत केएससीएचे धारवाड विभागाचे संयोजक अविनाश पोतदार, उपाध्यक्ष सुजित सोमसुंदर, सचिव संतोष मेननावर आणि विनय मृत्युंजय उपस्थित होते.</p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/commitment-to-improve-cricket-infrastructure-in-karnataka/">कर्नाटकात क्रिकेटच्या पायाभूत सुविधांच्या उन्नतीचे आश्वासन</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/commitment-to-improve-cricket-infrastructure-in-karnataka/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
		<item>
		<title>पहिल्या टी &#8211; ट्वेंटी सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी मात</title>
		<link>https://news24tassmarathi.in/india-beat-south-africa-by-101-runs-first-t20/</link>
					<comments>https://news24tassmarathi.in/india-beat-south-africa-by-101-runs-first-t20/#respond</comments>
		
		<dc:creator><![CDATA[Rohan Patil]]></dc:creator>
		<pubDate>Wed, 10 Dec 2025 08:13:16 +0000</pubDate>
				<category><![CDATA[cricket]]></category>
		<category><![CDATA[National]]></category>
		<category><![CDATA[Sports]]></category>
		<guid isPermaLink="false">https://news24tassmarathi.in/?p=12307</guid>

					<description><![CDATA[<p>हार्दिकचा निर्णायक झंझावात कटक : भारताने पहिल्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल १०१ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील<span class="excerpt-hellip"> […]</span></p>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/india-beat-south-africa-by-101-runs-first-t20/">पहिल्या टी &#8211; ट्वेंटी सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी मात</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></description>
										<content:encoded><![CDATA[<ul>
<li><span style="color: #ff0000;"><strong>हार्दिकचा निर्णायक झंझावात</strong> </span></li>
</ul>
<p style="text-align: justify;"><strong>कटक :</strong> भारताने पहिल्या टी २० सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा तब्बल १०१ धावांनी धुव्वा उडवला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने आपल्या टी २० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील १०० विकेट्स पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरी बजावली. कटकमध्ये झालेल्या या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत १७५ धावा केल्या तर प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संपूर्ण संघ केवळ ७४ धावांवर गारद झाला.</p>
<ul>
<li style="text-align: justify;"><span style="color: #ff0000;"><strong>दक्षिण आफ्रिकेची खराब सुरूवात :</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;">दक्षिण आफ्रिकेची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. १७५ धावांच्या उद्दिष्ठाचा पाठलाग करताना पावरप्लेअखेर आफ्रिकेने तीन विकेट्स गमावले होते. त्यानंतरही आफ्रिकेचे फलंदाज नियमित अंतराने माघारी परतत गेले आणि एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. त्यांच्या खराब फलंदाजीची झलक म्हणजे संपूर्ण संघातून केवळ चारच फलंदाज दहाच्या पुढे जाऊ शकले. दक्षिण आफ्रिकेकडून डेवाल्ड ब्रेविसने सर्वाधिक २२ धावा केल्या. तर कर्णधार एडेन मार्करम आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी प्रत्येकी १४, तसेच मार्को यान्सेनने १२ धावांचे योगदान दिले.</p>
<p style="text-align: justify;">भारताकडून गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर शिवम दुबे आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी एक-एक विकेट मिळवली. विशेष म्हणजे भारताच्या सर्वच गोलंदाजांनी विकेट घेतली, ही सामन्याची खास बाब ठरली. याचदरम्यान जसप्रीत बुमराहने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट्स पूर्ण करत ऐतिहासिक टप्पा गाठला. तो हा पराक्रम करणारा अर्शदीपनंतर भारताचा दुसरा गोलंदाज ठरला.</p>
<ul>
<li style="text-align: left;"><span style="color: #ff0000;"><strong>शुभमन गिल &#8211; सूर्यकुमार यादव मोठी खेळी साकारण्यात अपयशी :</strong></span></li>
</ul>
<p style="text-align: justify;">प्रारंभी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचे आमंत्रण दिल्यानंतर भारताची सुरुवात अडखळती झाली. मानेच्या दुखापतीतून सावरून पुनरागमन करणारा उपकर्णधार शुभमन गिल (४) आणि कर्णधार सूर्यकुमार यादव (१२) यांची निराशाजनक कामगिरी सुरू राहिली. लुंगी एन्गिडीच्या गोलंदाजीवर समोरील दिशेस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात हे दोघेही बाद झाले. अभिषेक शर्मालाही (१२ चेंडूंत १७) छाप पाडता आली नाही. यानंतर अक्षर पटेलला (२१ चेंडूंत २३) पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आली. त्याने आणि तिलक वर्माने (३२ चेंडूंत २६) संयमाने फलंदाजी करताना भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी पाच षटके खेळून काढताना ३० धावांची भागीदारी रचली. एन्गिडीने तिलकला माघारी धाडल्यानंतर हार्दिक फलंदाजीला आला. त्याने केशव महाराजच्या गोलंदाजीवर दोन षटकार खेचत आपले मनसुबे स्पष्ट केले. अन्य फलंदाज झगडत असताना हार्दिकने मात्र आक्रमक खेळ करताना भारताच्या डावाला गती दिली. त्याने २८ चेंडूंत सहा चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने नाबाद ५९ धावा फटकावल्या. त्यामुळे एकवेळ दीडशे धावाही अवघड वाटत असताना भारताला १७५ धावांची मजल मारता आली.</p>


<figure class="wp-block-image size-full"><img fetchpriority="high" decoding="async" width="1200" height="630" src="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/12/3-3.jpg" alt="" class="wp-image-12309" srcset="https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/12/3-3.jpg 1200w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/12/3-3-500x263.jpg 500w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/12/3-3-300x158.jpg 300w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/12/3-3-768x403.jpg 768w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/12/3-3-143x75.jpg 143w, https://news24tassmarathi.in/wp-content/uploads/2025/12/3-3-480x252.jpg 480w" sizes="(max-width:767px) 480px, (max-width:1200px) 100vw, 1200px" /></figure>
<p>The post <a href="https://news24tassmarathi.in/india-beat-south-africa-by-101-runs-first-t20/">पहिल्या टी &#8211; ट्वेंटी सामन्यात भारताची दक्षिण आफ्रिकेवर १०१ धावांनी मात</a> appeared first on <a href="https://news24tassmarathi.in">News 24 Tass Marathi</a>.</p>
]]></content:encoded>
					
					<wfw:commentRss>https://news24tassmarathi.in/india-beat-south-africa-by-101-runs-first-t20/feed/</wfw:commentRss>
			<slash:comments>0</slash:comments>
		
		
			</item>
	</channel>
</rss>
