विजयपूर / दिपक शिंत्रे
भगवान मर्यादा पुरुषोत्तमा श्री राम यांच्या जयंतीनिमित्त चैत्र नवरात्रीच्या विशेष प्रसंगी सुक्षेत्र शांति कुटीर कन्नूर येथे सप्ताहाची सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्षेत्राधिपती श्री दत्तात्रेयांचे पूजन, सद्गुरू महाराजांच्या मातोश्री यांच्या समाधी व निवासस्थानाचे पूजन आणि समाधी मंदिर व अधिष्ठान प्रतिमेंचे पूजन करून सप्ताहाची सुरुवात झाली.
श्री समर्थ रामदास स्वामींनी ग्रंथराज दासबोधाची रचना केली. त्याचा ग्रंथारंभ निरूपण समासावर श्री गणेश नाईक यांनी प्रवचन केले. आज सकाळी झालेल्या कार्यक्रमाला कन्नूर, विजयपूर, बंगलोर, मंगळूर, हुबळी, जमखंडी, डोमनाळ, अर्जनाळ, पुणे, मुंबई, सातारा, नाशिक, सोलापूर, हैदराबाद आदी भागातील भाविकांनी हजेरी लावली. सप्ताहाची सांगता 6 एप्रिल रोजी होणार आहे. उद्घाटनाच्या वेळी शांतिकुटीर ट्रस्टचे उपाध्यक्ष श्री. रवी दानी, श्री. व्ही. डी. पाटील, डॉ. एस.के. कन्नूर, श्री. रमेश कन्नूर, श्री. पी. एच. लमाणी, श्री. अजित कन्नूर, श्री. श्रीकृष्ण संपगांवकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
या सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे सहा दिशांनी येणारी दिंडी पदयात्रा. निती – भक्ती. आदर्शग्राम-स्वदेशी अभियानाची ही यात्रा गेली ३३ वर्षे सुरू आहे. सुमारे 15 दिवस चालणारी ही यात्रा 200 हून अधिक गावांना भेटी देऊन गावकऱ्यांना विधायक काम करण्यास प्रवृत्त करते.
इंडी तालुका अर्जनाळ-भक्ती कुटीर; आलमेल तालुका बोम्मनहलळळी येथील ब्रह्मानंद कुटीर; विजयपुर तालुका-खतिजापूर; जत, रामतीर्थ, ककमरी-ज्ञानकुटीर; सोलापूर जिल्हा बार्शी व मोहळ तालुका गोटेवाडी येथीलअध्यात्म कुटीर इ. भागातून या दिंडी पदयात्रा पथकांनी ठिकठिकाणी कार्यक्रम करित शांतीकुटीर कन्नूरपर्यंत प्रवास करत आहेत. ते 5 एप्रिल रोजी आश्रमात सामील होतील आणि 6 एप्रिल रोजी रामनवमीच्या विशेष कार्यक्रमात व सप्ताह समाप्तीच्या वेळी सहभागी होतील. त्या दिवशी हजारो भाविक सामील होण्याची अपेक्षा आहे. अध्यात्म भांडार ग्रंथमालेतील श्रेष्ठ ग्रंथ उपलब्ध असतील .ह्यांसंदर्भी शांतिकुटीर संदेश त्रैमासिक ही लोकार्पण केल आहे जात आहे.