विजयपूर / दिपक शिंत्रे
सरकारकडून रेशन दुकानातून गरीबांसाठी दिले जाणारे तांदूळ शेजारील महाराष्ट्रातील सोलापूरकडे घेऊन जात असताना, अन्नविभागाचे अधिकारी परमाणंद हुगर आणि इंडी शहर पोलिस स्टेशनचे अधिकारी भिसे यांनी छापा टाकून अंदाजे 32,000 रुपये किमतीचे तांदूळ आणि 5 लाख रुपये किमतीचे वाहन जप्त केले.

काल रात्रीच्यावेळी इंडी शहरातील रेल्वे स्थानकाजवळ अशोक लायलँड कंपनीच्या वाहन क्रमांक KA 28 AA 5706 मध्ये 25 प्लास्टिक पिशव्या भरून तांदूळ घेऊन जात असताना धाड घालून पकडण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी वकास अलीम शेख आणि सोहैल कलबुर्गी यांना अटक केली आहे. या संदर्भात इंडी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.