बेळगाव / प्रतिनिधी

पत्नीच्या जाचाला आणि धमक्यांना कंटाळून पतीने आत्महत्या केल्याची घटना बेळगावातील अनगोळ येथील दुर्गा कॉलनीमध्ये घडली आहे. सदर युवकाने पत्र लिहून ठेवून आत्महत्या केल्यामुळे हा उलगडा झाला आहे. सुनील मुलीमनी (वय ३३) असे या युवकाचे नाव आहे. त्याने स्वतःच्याच संगणक दुकानात वायरला गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी मृत्युपत्र लिहून पत्नी पूजा तिच्याकडून होत असलेला छळ आणि तिच्या धमक्या हेच आपल्या मृत्यूचे कारण असल्याचे म्हटले आहे. उद्यमबाग पोलिस ठाण्यात कलम १०८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनीलने पूजाशी चार वर्षांपूर्वी लग्न केले होते. त्याला तीन वर्षांचा मुलगा आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी बिम्स रुग्णालयाच्या शवागारात हलवण्यात आला आहे.