विजयपूर / दीपक शिंत्रे

एसएसएलसीचा (दहावी) निकाल जाहीर झाल्यानंतर काही तासांतच, चडचण तालुक्यातील हालसंगी गावात एका नापास विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे भाग्यश्री राजेंद्र हुगार (वय १६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. यावर्षीची एसएसएलसी परीक्षा देणारी भाग्यश्री हुगार ही परीक्षा उत्तीर्ण होण्याची आशा बाळगून होती. पण निकाल जाहीर झाला तेव्हा ती सर्व विषयांमध्ये नापास झाली. ज्यामुळे ती निराश होऊन आत्महत्या केली.

याबाबत प्राप्त माहितीनुसार, दुपारी भाग्यश्रीने आई – वडील घरी नसल्याचे पाहून खोलीच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद झलकी पोलिस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.