बेळगाव / प्रतिनिधी

राज्याचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी, राज्य सरकारच्या सार्वजनिक उपयोगिता विभाग आणि जिल्हा प्रशासनाने “पाच हमी” योजनांवर आधारित एक पुस्तिकेचे प्रकाशन जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.

माहिती आणि जनसंपर्क विभागाने प्रकाशित केलेल्या पाच हमींबाबत आज सोमवारी (५ मे) या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले,पंच हमी योजना समर्पित भावनेने राबवल्या जातील.या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचल्या आहेत, महिला, कामगारांसह अनेक लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी सदर योजना फायदेशीर ठरली असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले.

यावेळी  जनसंपर्क विभागाचे उपसंचालक गुरुनाथ कडबुर आणि जिल्हा पंचायती उप. सचिव बसवराज हेगनायक मतितारु उपस्थित होते.