कोल्हापूर / प्रतिनिधी
जोतिबा देवाची वर्षातील सर्वात मोठी चैत्र यात्रा १२ तारखेला पार पडली. त्यानंतर देखील गेले १५ दिवस देव दर्शनासाठी भाविकांची जत्रेसारखी गर्दी होत आहे. यात्रेनंतर दरवर्षी मंदिर स्वच्छतेचा पाकाळणी हा विधी केला जातो. यात्रेमुळे गुलालाने रंगलेले मंदिर, शिखर व मंदिराचा संपूर्ण परिसर पाण्याने स्वच्छ धुतला जातो.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, मंदिराचे पुजारी, गुरव व व ठराविक भाविकांच्या सहभागातून ही स्वच्छता केली जाते. त्यानुसार सोमवारी मंदिर स्वच्छ केले जाणार असून त्यामुळे सोमवार दिनांक २८ रोजी पहाटे ४ ते दुपारी ३ यावेळेत मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद राहिल. त्यानंतर दर्शन पूर्ववत सुरू होईल, असे कळविण्यात आले आहे.