विजयपूर / दिपक शिंत्रे

कुटुंबातील भांडणे, ताणतणावमुळे जिल्ह्यातील निडगुंदी तालुक्यातील अलमट्टी धरणाच्या कृष्णा नदीच्या पात्रात एका व्यक्तीने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रवी लमाणी (वय ४५) यांनी पुलावरून नदीत उडी मारून आत्महत्या केली. बागलकोट तालुक्यातील मुचखंडी गावातील रहिवासी रवीने घरी झालेल्या भांडणानंतर आत्महत्या केल्याची समजून येते. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला असून घटनेची नोंद निडगुंदी पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.