दिल्ली : राज्यसभा खासदार इराण्णा कडाडी यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्लीत भेट घेतली. या भेटीत वंदे भारत ट्रेन धारवाड ते बेळगाव पर्यंत वाढवण्याची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी आणि बेळगाव मिरज ते मुंबई – हॉस्पेट (ट्रेन क्र. 111139/6/6/40/T11139/40/T.Peturas) मेमो ट्रेन सेवा सुरू करावी, या आशयाचे निवेदन सादर करून सध्या सुरु असलेल्या गाड्या बळ्ळारी रेल्वे स्थानकापर्यंत वाढविण्याची मागणी केली.
यासंदर्भात खासदार कडाडी म्हणाले, रेल्वेमंत्र्यांनी माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि आमच्या शिष्टमंडळाच्या मागण्यांची आवश्यक कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे. यावेळी केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी आणि बेळगाव लोकसभा खासदार जगदीश शेट्टर उपस्थित होते.