विजयपूर / दिपक शिंत्रे

कुटुंबातील भांडणे, छळ सहन न झाल्याने एका पतीने आपल्या पत्नीची साडीने गळा दाबून हत्या केली आणि शेवटी झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या करून स्वतःचं जीवन संपविले असल्याची घटना घडली आहे.

विजयपुर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ पोलिस ठाण्या हद्दीतील गेद्दलमरी गावात त्यांच्या स्वतःच्या जमिनीत सोमवारी रात्री ही घटना घडली आहे मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मेघा उर्फ ​​मनम्मा हरनाळ (होसामणी) (वय २८) ही सिद्धप्पा मल्लप्पा हरनाळ (वय ३३) याने आपली पत्नी मेघा उर्फ मनम्मा हिचा तिच्याच साडीने गळा आवळून खून केला व नंतर स्वतः शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. पतीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत तर पत्नी मेघाचा मृतदेह झाडापासून वीस मीटर अंतरावर आढळून आला.

यादगीर जिल्ह्यातील हुनसगी तालुक्यातील एन्नी वाडीगेरी गावातील मृत्यूमूखी पडलेल्या मनम्माची आई गद्देम्मा बसप्पा होसमनी हिने मंगळवारी मुद्देबिहाल पोलिस ठाण्यात मेघाची हत्या करून आत्महत्या करणारा तिचा जावई सिद्धप्पा, तिच्या मुलीला आणि जावयाला त्रास देणारा सिद्धप्पाचा भाऊ श्रीकांत मल्लप्पा हरनाळ, आणि सिद्धप्पाची आई शांतम्मा मल्लप्पा हरनाळ यांच्याविरुद्ध संशय व्यक्त करुन तक्रार दाखल केली. संशयित खून व आत्महत्या केलेल्या या जोडप्याला चार मुले असून या घटनेमुळे त्या चारही मुलांचे भवितव्य अंधारात बुडाले त्याबद्दल गावकरी हळहळ व्यक्त करीत आहेत.

विजयपुराचे एसपी लक्ष्मण निंबंरर्गी, बसवनबागेवाडीचे डीएसपी बल्लप्पा नंदगावी, मुद्देबिहालचे सीपीआय मेहमूद फसिउद्दीन आणि पीएएस संजय तिप्पारेडु यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपास हाती घेतला.