बेंगळूर : दहशतवाद्यांविरोधात भारत सरकारच्या हल्ल्याला कर्नाटक सरकार पाठिंबा देत आहे. राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाची आहे. आम्ही शंभर टक्के राष्ट्रहिताच्या बाजूने आहोत, यात शंका नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, भारतीय लष्कराने तेथील निरपराध नागरिकांवर हल्ला केला नाही, केवळ दहशतवादी तळ शोधून ते उद्ध्वस्त केले, हे कौतुकास्पद आहे.
बेंगळूर येथे आज पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंधुरच्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे जवळपास ९ तळ उद्ध्वस्त करून पराक्रमही दाखवला आहे. पहलगामच्या घटनेनंतरही पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणे थांबवलेले नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर, पाकिस्तानने कधीही दहशतवाद्यांचा निषेध केला नाही आणि आपली बदनामी सुरूच ठेवली आहे. भारत सरकारच्या हल्ल्याला कर्नाटक सरकार पाठिंबा देत आहे. भारताने केलेला हा हल्ला पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा असून भारतीय सैनिक आणि भारतीय लष्कराने तेथील निरपराध नागरिकांवर हल्ला केला नाही, तर केवळ दहशतवाद्यांचे अड्डे ओळखून त्यांच्यावर हल्ले केले, हे वाखाणण्याजोगे असल्याचे ते म्हणाले.
राज्य सरकारही केंद्राच्या सहकार्याने राज्यात खबरदारीच्या उपाययोजना करत आहे. रायचूरमध्ये केंद्र सरकारच्या दरवाढी विरोधात आणि संविधान वाचवण्यासाठी राज्य काँग्रेस सरकारतर्फे निदर्शने करण्यात आली. मात्र, भारतीय लष्कराने दहशतवाद्यांवर केलेल्या हल्ल्यानंतर केंद्राचा निषेध करणे वाजवी नसल्याने आंदोलन रद्द करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकच्या विविध भागांत मॉक ड्रील घेण्यात येत असून राज्याला सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाची आहे. आम्ही शंभर टक्के राष्ट्रहितासाठी आहोत. यात शंका नाही, असे ते म्हणाले.