• बेळगाव जिल्हा आणि महापालिका प्रशासनातर्फे बसव जयंती साजरी

बेळगाव / प्रतिनिधी

जगातील महान तत्त्वज्ञ जगज्योति बसवेश्वर (बसवण्णा) यांची तत्त्वे सर्वांसाठी आदर्शवत असून आपण सर्वांनी त्याचे आचरण व अनुकरण केले पाहिजे, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.

बुधवारी शहरातील श्री बसवेश्वर उद्यानात जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव महापालिका, कन्नड आणि संस्कृती विभागाच्यावतीने झालेल्या बसव जयंती कार्यक्रमात मंत्री हेब्बाळकर बोलत होत्या. यावेळी त्या पुढे म्हणाल्या, धर्म आणि जाती यांच्यात विषाची बीजे पेरताना बसवण्णांची विचारधारा हे रोखू शकते. जात, पंथ आणि लिंगभेद नाकारणाऱ्या बसवण्णा यांनी सामाजिक क्रांती घडवून आणल्याचे त्यांनी सांगितले.

बसवण्णा यांनी आपले जीवन समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित केले. पण, आज स्वार्थ, खोटेपणा आणि फसवणूक अधिक सामान्य होत चालली आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, बसवेश्वर हे बाराव्या शतकात चिरकाल टिकून राहणाऱ्या समता, न्याय आणि मानवतेच्या मूल्यांचा उपदेश करणारे महान व्यक्ती होते. मी माझा मुलगा मृणाल हेब्बाळकर याला बसवण्णांच्या आदर्शांप्रमाणे राजकारणात जिंकणे आणि हरणे हे सामान्य आहे. तेव्हा जीवनात त्यांनी घालून दिलेला मार्ग अवलंबण्याची शिकवण दिली आहे असे सांगितले.

यावेळी रत्नप्रभा बेल्लद, बसवराज जगजंपी, डॉ. एच. बी. राजशेखर, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, आर. पी. पाटील, मुरगेंद्रगौडा पाटील, मृणाल हेब्बाळकर, विद्यावती भजंत्री, अनंत बोकडे, उदयकुमार तलवार, सोमलिंग मविनकट्टीआदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.