- ऑपरेशन सिंदूरद्वारे ९ दहशतवादी तळं केले उद्ध्वस्त
नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने जम्मू – काश्मीर मधील पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. एका गुप्त मोहिमेच्या अंतर्गत भारतीय सैन्यदलाने पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये नऊ ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे.
संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार भारतीय सैन्यदलांनी ‘ऑपरेशन सिंदूरद्वारे’ पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांच्या मुलभूत ठिकाणांवर हल्ले केले. यामध्ये बहावलपूर, मुरिदके, गुलपूर, भीमबर, चक अमरु, बाग, कोटली, सियालकोट, मुजफ्फराबाद या नऊ ठिकाणांवर हल्ले करण्यात आले. दरम्यान भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली आहे.