- संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त
दिल्ली : भारताने मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केला होता, त्यानंतर ड्रोन हल्ला देखील करण्यात आला आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आता या हल्ल्याला भारताकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भारताकडून लाहोर, रावळपिंडी, कराचीसह पाकिस्तानच्या बारा शहरांवर ड्रोन हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये पाकिस्तानची संपूर्ण रडार सिस्टिम उद्ध्वस्त करण्यात आली आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानात चांगलीच खळबळ उडाली आहे. भारताच्या या कारवाईचा धसका पाकिस्तानने घेतला आहे.