• गुढीपाडव्या दिवशीच दुर्दैवी घटना  
  • एकाचा मृतदेह सापडला 

विजयपूर / दीपक शिंत्रे

आलमट्टी जलाशयाच्या पुढील भागात रेल्वे पुलाच्या खाली कृष्णा नदीच्या पात्रात नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी आंघोळीसाठी गेलेली तीन मुले वाहून गेल्याची घटना घडली. त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतर दोघांच्या मृतदेहांचा शोध सुरू आहे. सोमशेखर बोमण्णा देवरमनी (वय १५), मल्लप्पा बसप्पा बगली (वय १५), परनगौडा मल्लप्पा बिळगी (वय १७) तिघेही (रा.इल्याळ ता. बागलकोट) अशी त्यांची नावे आहेत.

या तिघांपैकी सोमशेखर याचा मृतदेह सापडला असून मल्लप्पा व परनगौडा या दोघांच्या मृतदेहाचा नदीपात्रात शोध सुरु आहे. घटनेची माहिती मिळताच बागलकोट अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बागलकोट तालुक्यातील सितीमनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून घटनास्थळी बागलकोट सीपीआय एच.आर.पाटील भेट देऊन पाहणी केली आहे.